कोरोना महामारीमुळे जपानी तरुण-तरुणींमध्ये विवाह न करण्याचा ट्रेंड अधिकच वेगवान केला आहे. 2020 मध्ये देशभरात 5 लाख 37 हजार 583 विवाह झाले आहेत. 2019 च्या तुलनेत हे प्रमाण 12.7 टक्क्यांनी कमी आहे. तसेच 71 वर्षांमधील सर्वात मोठी घसरण झाली आहे. 2020 मध्ये 8 लाख 72 हजार 683 मुलांचा जन्म झाला. 2019 च्या तुलनेत 25,917 मुले कमी जन्मली आहेत. मुलांच्या जन्माप्रकरणी ही घसरण 122 वर्षांमध्ये सर्वाधिक आहे.
यामागील कारण तरुणाईवरील वाढता आर्थिक भारत आहे. याचमुळे जपानी लोकसंख्या कमी होत असून वृद्ध होत चालली आहे. विवाहाच्या घटत्या ट्रेंडदरम्यान वेडिंग कंपन्यांनी नाविन्यपूर्ण कल्पना स्वीकारल्या आहेत. उदाहरणार्थ येथे अनेक कंपन्या प्रायोगिक (फेक) विवाह करवत आहेत, जेणेकरून महिलांना विवाहातील विधींची जाणीव व्हावी आणि हा संस्मरणीय दिवस त्यांना घडवून आणावासा वाटावा.
जपानमध्ये मोठी समसया
या पॅकेज अंतर्गत युवतीला वधूप्रमाणे सजविण्यात येते. विवाहाचे सर्व विधी केले जातात. भाडेतत्वावर वर (नवरा) आणि पाहुण्यांना बोलाविले जाते. अल्बमही तयार करण्यात येतो. ही कल्पना सर्का ट्रव्हल कंपनीच्या अध्यक्षा युकिको इनोयु यांची होती. देशात तरुणाईला विवाहाकरता प्रेरित करण्यासाठी हे पॅकेज सुरू केले होते. या आयोजनामुळे महिलांमध्ये सकारात्मकता दिसुन येते. पण लोक आता अधिक स्वारस्य दाखवत नाहीत. जपानमध्ये 20-49 वयोगटातील एक चतुर्थांश लोक अविवाहित असल्याचे त्या सांगतात.
हवाई, बालीची ऑफर
लोक आर्थिक स्थिती आणि रोजगाराच्या सुरक्षेवरून चिंतेत आहेत. कोरोनाने या मानसिकतेला अधिक तीव्र केले आहे. लोकांना प्रेरित करण्यासाठी वेडिंग कंपन्या हवाई, बाली यासारख्या भव्य ठिकाणी विवाहसोहळे आयोजित करत आहेत. विदेशी पुरोहित आणि पाद्रय़ांची सेवा घेतली जात आहे. पण तरीही ते उपयुक्त होताना दिसून येत नाहीत.
विवाहाचे स्वारस्य घटले
महामारीपूर्वीच लोकांमध्ये विवाह करण्याचे स्वारस्य घटले होत. एक दशकापूर्वी दर शनिवार-रविवारी 7-8 विवाह सोहळे आयोजित करत होतो. मागील काही वर्षांमध्ये आठवडय़ाला एखादा विवाहसोहळाच आयोजित करत आहोत असे योकोहामा येथील वेडिंग कंपनीच्या कर्मचाऱयाने सांगितले आहे.