लॉकडाऊनच्या काळात शेअर बाजारात झालेल्या प्रचंड घसरणीनंतर जवळपास मागील दोन-अडीच महिने टप्प्याटप्प्याने तेजी ‘अनलॉक’ होऊ लागली होती. परंतु सरता आठवडा बाजारासाठी अत्यंत नकारात्मक ठरला. घटलेला जीडीपी, अमेरिकन बाजारातील घसरण, भारत-चीनमधील वाढता तणाव आणि सेबीच्या बदललेल्या नियमांमुळे निर्देशांकात तीव्र घसरण झाली. तेजीला लागलेला हा ब्रेक याही आठवडय़ात कायम राहू शकतो. कदाचित काही मोठे चढउतारही पहावयास मिळू शकतात. त्यामुळे ‘जपून चाल…’ हीच रणनीती ठेवावी.
मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सरता आठवडा नकारात्मक ठरला. गेले काही आठवडे सातत्याने वर-वर सरकणारा निर्देशांक आणि तेजीचा माहोल यामुळे दाटून आलेल्या गुंतवणूकदारांच्या उत्साहावर सरत्या आठवडय़ात अक्षरशः विरजण पडले. आठवडय़ाचा पहिला दिवस म्हणजेच 31 ऑगस्ट वगळता उर्वरित चारही दिवस बाजारासाठी निराशाजनक राहिले. आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सेन्सेक्समध्ये 633.76 अंकांची घसरण झाली आणि 38357.18 वर तो बंद झाला; तर निफ्टी 193 अंशांनी घसरुन 11333 वर बंद झाला. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असणाऱया 30 कंपन्यांपैकी केवळ मारुतीच्या समभागांमध्ये वृद्धी दिसून आली.
बाजारातील तेजीच्या सातत्याला ब्रेक लागण्यास काही प्रमुख गोष्टी कारणीभूत ठरल्या. त्या लक्षात घेणे गरजेचे आहे; कारण त्यावर या आठवडय़ातील आपली रणनीती असायला हवी. शुक्रवारच्या घसरणीला असलेले एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील कारण म्हणजे अमेरिकन बाजारात झालेली पाच टक्क्मयांची घसरण. जूननंतर अमेरिकन बाजारात झालेली ही सर्वांत मोठी घसरण ठरली. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे भारत-चीन यांच्यात निर्माण झालेली युद्धसदृश परिस्थिती. पेंगाँग सोच्या खोऱयातील चकमकींच्या बातम्या सोमवारी झळकल्या आणि त्याने बाजारात कोलाहल माजवला. हा संघर्ष अद्यापही कायम आहे. दुसरीकडे राष्ट्रीय सांख्यकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीत एप्रिल ते जून या नवआर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तब्बल 29 टक्क्मयांची घट झाल्याचे समोर आले. सलग दोन तिमाही अर्थव्यवस्थेत घट दिसून आली असून जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीतही ती कायम राहील, असा अर्थतज्ञांचा अंदाज आहे. अर्थातच ही बातमी बाजारासाठी प्रचंड नकारात्मक ठरली आहे. कोरोनामुळे महामंदीच्या दिशेने देशाची अर्थव्यवस्था जात असल्याचे अंदाज खरे ठरत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. सेबीकडून जारी करण्यात आलेल्या मार्जिनसंदर्भातील बदलांची सुरुवात 1 सप्टेंबरपासून झाल्यामुळे त्याचाही परिणाम बाजारावर जाणवला. शेअर खरेदी-विक्रीबाबतच्या या नव्या नियमांमुळे गुंतवणूकदारांत संभ्रम तर ब्रोकर्समध्ये नाराजी दिसून येत आहे. याखेरीज कोरोनाकाळात कर्जाचे हप्ते भरण्यात दिलेली सवलतही संपुष्टात आली असून 1 सप्टेंबरपासून हप्त्यांचा कालखंड सुरु झाला आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम नफावसुली करुन समभागांची विक्री करण्यातून दिसून आला.
शेअर बाजारात सलगच्या तेजीनंतर घसरणीचा काळ येतच असतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरुन न जाण्याची गरज नाही; मात्र सतर्क राहणे आवश्यक आहे. निफ्टी 11300 च्या खाली गेलेला नसल्याने बाजाराती स्थिती अद्यापही चांगली आहे. तथापि, भारत-चीन संघर्षात काही महत्त्वाची घडामोड घडते का यावर चालू आठवडय़ात लक्ष ठेवून राहणे गरजेचे आहे. जवळपास संपूर्ण आठवडा घसरण सुरु असतानाही काही समभागांनी आपला तेजीचा झेंडा रोवण्यात यश मिळवले. यामध्ये आयडीया-व्होडाफोनचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. एक सप्टेंबरनंतरच्या चार सत्रात आयडियाचा समभाग 60 टक्क्मयांनी वधारल्याचे दिसून आले आहे. एजीआरचे देयक अदा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कंपनीला 10 वर्षांची मुदत दिली आहे. कंपनी समभाग विक्री आणि नवगुंतवणूकदारांच्या कर्जातून 25 हजार कोटी उभारणार आहे. या समभागाचा अल्पकाळाच्या लाभासाठी विचार करता येईल. रुपयामध्ये झालेली घसरण आयटी आणि औषधनिर्मितीसारख्या निर्यातकेंद्री कंपन्यांसाठी फायद्याची ठरणार आहे. त्यामुळे इन्फोसिससारख्या कंपन्यांच्या समभागांवर लक्ष ठेवून राहा. केंद्र सरकारने दुचाकी आणि चारचाकी वाहनांवरील जीएसटीच्या दरात कपात करण्याचे संकेत नुकतेच दिले आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्राकडून दीर्घकाळापासून याबाबत मागणी केली जात होती. त्यामुळे चालू आठवडय़ात ऑटोमोबाईल कंपन्यांच्या समभागात तेजी दिसून येऊ शकते. यामध्ये टाटा मोटर्सचे समभाग खरेदी करणे फायदेशीर ठरु शकेल. केंद्र सरकारने 250 इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीसाठी टाटा मोटर्स आणि ह्यंgदाईची निवड केली आहे. त्यामुळे टाटा मोटर्सचा समावेश पोर्टफोलियोमध्ये नसल्यास तो करावा. याखेरीज पाच पैसा कॅपिटल, केईसी इंटरनॅशनल, कोकुयो कॅमलीन, लिंक पेन, केईसी इंटरनॅशनल या समभागांमध्ये तेजी दिसून येऊ शकते. केंद्र सरकार राज्यातील सर्वच सरकारांना मुद्रांक शुल्कामध्ये कपात करण्याबाबत सूचना करणार आहे. त्याचे परिणाम रिअल्टी क्षेत्रात दिसून येतील. गोदरेज प्रॉपर्टीसारख्या कंपन्यांच्या समभागांवर याचा परिणाम दिसून येऊ शकतो.
चालू आठवडय़ात बाजारात काही आयपीओ दाखल होत आहेत. यामध्ये हॅपिएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीचा आयपीओ 7 सप्टेंबर रोजी खुला होणार आहे. ग्रे मार्केटमधील याची चर्चा आणि कंपनीचे व्यवसाय प्रतिमान पाहता या आयपीओची खरेदी करणे नक्कीच फायद्याचे ठरेल. रुट मोबाईल या क्लाऊड कम्युनिकेशन कंपनीचा आयपीओ 9 सप्टेंबर रोजी येणार आहे. त्यावरही नजर ठेवून राहावे.
सध्याचा काळ शेअर बाजारात करेक्शनचा आहे. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक सावधपणाने आणि अभ्यासाने करावी. बाजारातील हेलकावे येणाऱया काळात वाढण्याची शक्मयता आहे. अशा वेळी स्टॉपलॉसचे आयुध न वापरता साहसी खेळ खेळू नका. तात्काळ आणि अल्पकालीन फायद्याचा विचार करणाऱयांनी सध्या आस्ते कदम किंवा तटस्थ राहणेच हिताचे आहे. विशेषतः सोमवारी होणारी बाजाराची सुरुवात आणि मध्यापर्यंतचा कल पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
– संदीप पाटील