प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यात प्रवेश करणाऱया चाकरमान्यांना कोरोना चाचणीचे घातलेले बंधन हटवले आहे. त्यामुळे चाकरमानी आपल्या गावी कोणत्याही अडचणींशिवाय येऊ शकतात़, असे मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे गणेशोत्सवासाठी जिह्यात येणाऱयांना दिलासा मिळाला आह़े
अवघ्या काही दिवसांवर येणाऱया गणेशोत्सवात कोरोना चाचण्यांबाबत संभ्रम निर्माण झाला होत़ा यामध्ये राज्य शासनाकडून कोकणात जाणाऱयांसाठी कोरोना चाचणी करून जाणे बंधनकारक केले होत़े तसेच रत्नागिरीचे जिल्हाधिकारी ब़ी एन पाटील यांनीसुद्धा ऍन्टिजेन, आरटीपीसीआर टेस्ट करून आलेल्यांनाच प्रवेश द्यावा अशा सूचना ग्रामकृतीदलाला दिल्या होत्य़ा सोमवारपासून जिह्यामध्ये चाकरमानी दाखल होण्यास प्रारंभ झाल्यानंतर काही ठिकाणी वादाचे प्रसंग निर्माण झाले होत़े
याबाबत सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषद घेत कोरोना चाचणीसंदर्भातील संभ्रम दूर केल़ा यावेळी सामंत म्हणाले, नुकतेच रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱयांशी चर्चा केली आह़े त्यानुसार आता जिल्हा प्रवेशासाठी कोरोना चाचणी बंधनकारक नसल्याचेच दोन्ही अधिकाऱयांनी सांगितले आह़े त्यामुळे यापुढे कुणीही ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून संभ्रम निर्माण करू नये, असेही सामंत यांनी सांगितल़े
मागील काही दिवसांपासून जिल्हय़ातील चेकपोस्ट, महत्त्वाची बसस्थानके, रेल्वेस्थानके येथे आरोग्य विभागाची पथके तैनात करण्यात आली होत़ी †िजल्हय़ात येणाऱया प्रवाशांच्या नावासह, संपर्कक्रमांक, गाव, कोरोना डोस, चाचणी यांची माहिती घेतली जात होत़ी ग्रामकृतीदलांनी गावात बाहेरुन येणाऱया लोकांची यादी तयार करावी. ज्यांची कोरोणा चाचणी करणे आवश्यक आहे त्याची यादी आरोग्य विभागास उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले होत़े
केरळ येथे ओणम सणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर झाला होत़ा या पार्श्वभूमीवर कोकणातील गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱया चाकरमान्यांसाठी कोरोना चाचणीचे निर्बंध घातले होत़े याबाबत मुंबईतून येणाऱयांमध्ये नाराजी होत़ी यामुळे लोकप्रतिनिधींवर देखील दबाव वाढण्यास सुरूवात झाली होत़ी