15 व्या दिवसानंतरही संपाचा तिढा कायम
प्रतिनिधी/ रत्नागिरी
एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी संपावर गेलेल्या जिल्हय़ातील आणखी 19 कर्मचाऱयांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आह़े यामध्ये चिपळूण आगारातील 1, राजापूरमधील 15 तर खेडमधील 3 जणांचा समावेश आह़े यापूर्वी चिपळूण येथील 12 कर्मचाऱयांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली होत़ी त्यामुळे जिल्हय़ात सेवा समाप्तीची कारवाई झालेल्यांची संख्या आता 31 वर पोहचली आह़े
एसटीच्या संपात सहभागी झालेल्या रत्नागिरी विभागातील 249 कर्मचाऱयांना सेवा समाप्तीची नोटीस बजावण्यात आली होत़ी यातील 31 कर्मचाऱयांवर आत्तापर्यंत बडतर्फीची कारवाई करण्यात आली आह़े अन्य कर्मचाऱयांना नोटीस मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्याने कारवाईस उशीर होत आह़े पुढील दिवसांत अन्य जणांवरही कावाई होण्याचे संकेत रत्नागिरी विभागाकडून देण्यात आले आहेत़
सोमवारी न्यायालयाच्या निर्णयानंतर एसटीचा संप समाप्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होत़ी मात्र ठोस तोडगा निघू न शकल्याने संप चिघळण्याची स्थिती निर्माण झाली आह़े चिपळूण आगारातून चिपळूण ते रत्नागिरी मार्गावर 1 तर राजापूर आगारातून 3 बसगाडय़ा सुरू असल्याचे सांगण्यात येत आह़े कामावर हजर रहाण्यासंदर्भात एसटी कर्मचाऱयांमध्ये सभ्रमावस्था आह़े 15 दिवसांच्या संपानंतर काही कर्मचारी कामावर हजर राहण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याचे सांगण्यात येत आह़े मागील दोन वर्षापासून आर्थिक अडचणींचा सामना करणाऱया एसटी कर्मचाऱयांच्या संपातून तातडीने तोडगा निघण्याची शक्यता दिसून येत नाह़ी दरम्यान मागील 15 दिवसांत एसटीला मोठे नुकसान व प्रवशांना त्रास सहन करावा लागत आह़े
चिपळूण-रत्नागिरी फेरीतून साडेसहा हजाराचे उत्पन्न
एस.टी. कर्मचाऱयांनी पुकारलेला संप अद्याप सुरूच असताना गेल्या दोन दिवसात चिपळूण बसस्थानकातून चिपळूण-रत्नागिरी फेरी रवाना झाली होती. त्यातून आगाराला साडेसहा हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.
संप काळात 20 व 21 रोजी चिपळूण आगारातून सकाळी 10.30 च्या सुमारास चिपळूण-रत्नागिरी फेऱया सोडण्यात आल्या होत्या. चिपळूण आगारातील चालक कम वाहक सुशांत आंब्रे यांनी ही बसगाडी रत्नागिरीला नेली होती. संप काळात सामान्य प्रवाशाच्यासाठी सोडण्यात आलेल्या या बसफेरीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. या फेरीला 20 रोजी 3 हजार, तर 21 रोजी साडेतीन हजार असे एकूणच साडेसहा हजार उत्पन्न मिळाले. दरम्यान, या संपकाळात सर्वच एस.टी. फेऱया रद्द झाल्याने परिणामा दरदिवशी 9 लाखाचे नुकसान होत आहे. …