प्रतिनिधी/ सातारा
गेल्या काही दिवसांपासून पडणाऱया मुसळधार पावसामुळे साताऱयासह सांगली, कोल्हापूर, कोकणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक मार्गावर दरडी कोसळल्या आहेत. धरणे भरल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. काही गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे प्रवास थांबला आहे. यांचा फटका एसटी बसला ही बसला असून जिह्यातील 136 फेऱया रद्द झाल्या आहेत.
लॉकडाऊनमध्ये बंद असणाऱया एसटीबसचा प्रवास तालुका स्तरावर सुरू होता. यामुळे परिवहन महामंडळाला काहीसा दिलासा मिळाला. मात्र, गेल्या काही दिवसापासून पडणाऱया पावसाने जिह्यात हाहाकार झाला आहे. अनेक गावांत पूर आला आहे. दरडी कोसळल्याने प्रवास ठप्प झाला आहे. सर्वत्र बचाव कार्य सूरू आहे. कराड, पाटण, महाबळेश्वर येथील सर्व फेऱया रद्द केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक पाटण तालुक्यात 39, कराड तालुक्यात 25 फेऱयांचा समावेश आहे. तसेच वाई 16 फेऱया, सातारा 14, फलटण 13, महाबळेश्वर 13, मेढा 8, दहीवडी 5, परगाव खंडाळा 3, कोरेगाव 0, वडूज 0 येथील विभागनिहाय फेऱया रद्द झाल्या आहेत. पुलावरून पाणी वाहत असताना एसटीबस पाण्यात नेऊ नये, अशा वेळी जवळच्या ग्रामपंचायतीत किंवा आगारात एसटीबस थांबवावी, अशा सूचना विभाग नियंत्रक सागर पळसुळे यांनी चालक वाहकांना केल्या आहेत.