प्रतिनिधी/ रत्नागिरी
शनिवारी जिह्यामध्ये 502 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले तर 16 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े जिह्यात ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत कडक निर्बंध लागू करून 1 महिना लोटला असला तरी कोरोना रूग्णांमधील वाढ कायम आह़े विशेषतः यावेळी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रभाव अधिक दिसत आह़े जिल्हा प्रशासनापुढे कोरोना रूग्णसंख्या कमी करण्याचे मोठे आव्हान ठरत आह़े
जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 267 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 11 तर आधीचे 224 असे 502 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 29 हजार 850 इतकी झाली आह़े तर मागील 24 तासांमध्ये 16 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 16 मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 7, चिपळूण 3, दापोली 1, गुहागर 1, लांजा 2, राजापूर 2 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा एकूण मृतांची संख्या 905 इतकी झाली आह़े तर मृत्यूदर 3.03 इतका आह़े