राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
गेल्या काही दिवसांपुर्वी गंगा नदी पात्रात सापडणारे मानवी मृतदेह यावरुन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून टीका होत आहे. यातच आता काँग्रेस नेते राहूल गांधी यांची ही भर पडली असून याच पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली आहे. आपल्या ट्वीट मध्ये ते म्हणतात ज्यांनी कधी म्हटल होतं की माता गंगेने आम्हाला बोलावल आहे. त्यांनीच माता गंगेच ह्रदय द्रवेल असे कृत्य करत गंगेला रडायला लावले आहे.
या पूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती.ज्यांनी भगवी वस्त्रे परिधान करत राजसत्ता मिळवली आहे. ते सत्तेच्या नशेने उन्मत्त झाले आहेत. असे भाष्य सुरजेवाला यांनी केलं होतं.
नदी पात्रात आढळले तरंगते मानवी मृतदेह
उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील गंगा पात्रात मानवी मृतदेह सापडत अल्याने संबंधीत क्षेत्रातील नागरिकांनी असे मानवी देह पाण्यात सडल्यास हे पाणी वापरणाऱ्यांना कोरोनाची बाधा होण्याची भीती व्यक्त केली होती. याची दखल घेत संबधीत प्रशासनाने पाण्यावर तरंगणाऱ्या मृतदेहासंदर्भात माहिती घेतली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आलं होते.