बेळगाव / प्रतिनिधी
शहरात भटक्मया कुत्र्यांचा उपद्रव मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. ही कुत्री अन्नाच्या शोधात असतात. अन्न मिळाले नाही तर रस्त्यावरून ये-जा करणाऱया नागरिकांचा चावा घेत आहेत. टिळकवाडीतील सोमवारपेठ, मंगळवारपेठ, गुरुवारपेठ आदी भागात त्यांचा उपद्रव मोठय़ा प्रमाणात वाढला असून नागरिकांची डोकेदुखी बनली आहे.
रात्रीच्या अंधारात तर ही सर्व कुत्री घोळका करून ओरडत भटकत असतात. त्यामुळे ज्ये÷ नागरिक व लहान मुलांच्या झोपेवर परिणाम होत आहे. दिवसा ती अन्नाच्या शोधात भटकत असतात. अन्न मिळाले नाही तर कचराकुंडीतील कचरा इतस्ततः विखरून अन्न शोधतात.
या भागात अनेक हॉटेल असल्यामुळे हॉटेलच्या बाहेरही अन्न मिळवियासाठी तळ ठोकून बसलेली असतात. याबरोबरच रात्री वाहनधारकांचा पाठलाग करत असल्यामुळे पडून वाहनधारक जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने परिसरातील भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.