वाहनांच्या तंत्रज्ञान, विकासावर भर देणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोयोटा किर्लोस्कर मोटार(टीकेएम) कंपनी आगामी 12 महिन्याच्या कालावधीत वाहनांच्या सुधारीत तंत्रज्ञानावर आणि सुटय़ा भागांच्या विकासासाठी जवळपास 2,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक करणार असल्याची माहिती टोयोटा किर्लोस्करचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांनी दिली आहे.
भारतामध्ये जादा कराचा भार असल्यामुळे आपल्या व्यवसायाच्या विस्तारावर मर्यादा येत असल्याने सध्या उपलब्ध क्षमतेचा वापर करुन येत्या काळात कंपनी सुधारीत तंत्रज्ञानासह सुटय़ा भागांच्या कार्याला चालना देण्यावर भर देणार असल्याची माहिती यावेळी दिली आहे. यामध्ये कंपनी भारतात कार आणि बाईकच्या उत्पादनासाठी गुंतवणूक करणार आहे. भारतातील कर जास्त असला तरी कंपनीने गुंतवणूक न करण्याबाबत कोणतेही विधान केलेले नाही. तेव्हा येत्या काळात गुंतवणूकीसाठी कंपनी तयार असणार असून भारताचे भविष्य उज्ज्वल असणार असून कंपनी स्थानिक ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासोबत निर्यातीवरही भर देण्याचा प्रयत्न करणार आहे. समाज, पर्यावरण, कौशल्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदान कंपनीकडून कायमस्वरूपी यापुढेही राहणार आहे, असा विश्वास विक्रम किर्लोस्कर यांनी व्यक्त केला.