विमान प्रवाशांमधून नाराजी : तांत्रिक कारणाने सप्टेंबरमध्ये अनेक विमानफेऱया रद्द
प्रतिनिधी /बेळगाव
विमान रद्द झाल्यानंतर प्रवाशांनी भरलेली तिकिटाची रक्कम त्यांना परत करावी लागते. परंतु मागील अनेक महिन्यांपासून ट्रूजेट विमान कंपनीने रद्द झालेल्या विमान तिकिटाची रक्कम अद्याप दिलेली नाही. अनेक प्रवाशांचे पैसे कंपनीकडे अडकून पडले आहेत. पैसे परत करण्याबद्दल कंपनीकडून कोणतीही हालचाल केली जात नसल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
ट्रू जेट विमान कंपनी बेळगावमधून म्हैसूर, तिरुपती, कडप्पा व हैदराबाद या चार शहरांना सेवा देत होती. परंतु कंपनीच्या काही तांत्रिक कारणामुळे सप्टेंबरपासून विमानसेवा ठप्प आहे. या कंपनीला उडान 3 अंतर्गत मार्ग मंजूर झाल्यामुळे स्वस्त दरात तिकीट दर उपलब्ध होता. त्यामुळे अनेक प्रवाशांनी पुढील काही महिन्यांचे तिकीट बुकिंग केले होते.
कंपनीकडून तांत्रिक कारण देत सप्टेंबर महिन्यात अनेक विमान फेऱया रद्द करण्यात आल्या. रद्द करण्यात आलेले विमानफेरीचे तिकीट ग्राहकांना रिफंड करणे आवश्यक होते. यासाठी ग्राहकांनी अनेकवेळा कंपनीशी तसेच सांबरा येथील ट्रू जेटच्या कार्यालयाशी संपर्कही साधला. परंतु अद्याप त्यांना पैसे परत मिळालेले नाहीत.
विमान उपलब्ध नसल्याचे कारण देत रद्द
सप्टेंबरमध्ये प्रवासासाठी तिकीट बुक केले होते. 2 हजार 522 रुपयांची दोन तिकिटे बुकिंग केली होती. प्रवासाच्या बारा तास अगोदर कंपनीकडून विमानफेरी रद्द केल्याचा मेसेज आला. विमान उपलब्ध नसल्याचे कारण देत विमान रद्द करण्यात आले. परंतु अद्याप तिकिटाची रक्कम रिफंड करण्यात आलेली नाही.
– केतन बागेवाडी (प्रवासी)
ग्राहकांचे पैसे परत मिळण्याबाबत प्रयत्नशील
अनेक ग्राहकांना ही समस्या सतावत आहे. विमानफेरी रद्द केल्यामुळे प्रवाशांचे नुकसान झाले आहे. आम्ही सतत कंपनीच्या वरि÷ अधिकाऱयांच्या संपर्कात असून, ग्राहकांचे पैसे परत मिळण्याबद्दल प्रयत्नशील असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.
– राजेशकुमार मौर्य (संचालक बेळगाव विमानतळ)