डिचोली/प्रतिनिधी
डिचोली औद्योगिक वसाहतीतील व्हिनस इथोक्सीथेर्स प्रा. लि. या कंपनीतील 142 कामगारांना सध्या कंपनीने कामावरून कमी करण्याची नोटीस बजावल्याने सदर सर्व कामगार हवालदिल झाले आहेत. कंपनीने चालविलेली प्रक्रिया ह बेकायदेशीर असून त्याविरोधात गेवर धरणे धरणार आहे. तसेच आतील सामान बाहेर काढण्यास आम्ही विरोध करणार असल्याचे या कामगारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेल्या 22 जून रोजी कंपनीने कामगारांना कोणतीच पूर्वसुचना न देताच कंपनी बंद करण्याचे सुतोवाच केले होते. त्यावेळी कामगार संघटना आणि कामगारांनी त्याबाबतचे स्पष्टीकरण मागितले असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली होती. कोवीड महामारीत कोणत्याही कंपनीने कामगरांना कामावरून कमी करू नये असे सरकारचे परिपत्रक असतानाही कंपनीने डिचोली औद्योगिक वसाहतीतील आपल्या या अस्थापनात कामावर असलेल्या 235 पैकी 96 कामगारांची इतरत्र बदली केली होती. त्यामुळे आता या कंपनीत कामावर असलेल्या 142कामगारांना कामावरून थेट घरी पाठविण्याचा घाट कंपनीने रचला आहे. असे कामगार संघटनेचे ओजस पंडित यांनी सांगितले.
गेल्या 22 सप्टें. रोजी कंपनीने बेकायदा नोटीस लावली होती. त्यानंतर कामगार संघटना आणि कामगर मजूर आयोगाला भेटले. सदर प्रकरण आता मजूर आयोगाकडे असतानाही कंपनीने आपली कार्यवाही चालूच ठेवली आहे. व्यवस्थापनाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता ते जवळच घेत नाहीत. सदर व्यवस्थापन आज सरकारलाही जुमानत नाही. येत्या 26 ऑक्टो. रोजी कामगारांची व्यवस्थापाबरोबर बैठक ठरविण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच कंपनीने मुख्य गेटला टाळे ठोकून कामगारांनी बाहेर ठेवले आहे. असे कामगारांनी सांगितले.
21 ऑक्टो. रोजी रात्रपाळी संपल्यानंतर कंपनीच्या गेटला व प्ला?टला टाळे मारून पुढील तीन दिवस पेड सुट्टी असल्याची नोटीस मारण्यात आली होती. त्यानुसार कामगारांनी कंपनीत कामावर रूजू होण्यासाठी कंपनी गाठण्याचा प्रयत्न केला असता. कंपनीच्या मुख्य गेटला टाळे ठोकल्याचे निदर्शनास आले. याबाबत विचारणा केली असता कोणीही काहीच सांगायला तयार नाही. असे अविनाश आरोलकर, सुर्या धारगळकर या कामगारांनी सांगितले.
या कंपनीचे उत्पादन रसायन असून ते आरोग्यासाठी सर्वात घातक आहे. याच जाणीव असतानाही आम्ही आज जिवावर उदार होऊन आमचा संसार चालविण्यासाठी या कंपनीत काम करीत होतो. गेली अनेक वर्षे य कंपनीत काम केल्यानंतर आज कंपनीतर्फे कामगरांना हे फळ देण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेचे सामान कामगारांना कंपनीतर्फे पुरविले जात नाही. कोणाला काही दुखापत सुध्दा झाल्या कंपनी त्याची विचारपूस करीत नाही. या कंपनीच्या 24 तासात तीन पाळय़ा चालतात. आणि उत्पादनही चांगले होत होते आणि निर्यातही होत असतानाही आज कंपनी तोटय़ात चालत असल्याची सबब पुढे करून कामगारांना घरी बसविण्यासाठी कंपनी प्रयत्न करीत आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. हे पाऊल घेण्यापूर्वी कंपनी व्यवस्थापनाने कामगारांचा विचार करणे गरजेचे होते. अशी प्रतिक्रिया कामगारांनी व्यक्त केली.
हा विषय घेऊन कामगार गेल्या दोन तीन महिन्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर यांच्यासह जिल्हाधिकारी, मजूर आयोग, पोलीस यांनाही भेटून आपली कैफियत मांडली. मुख्यमंत्री व सभापती यांच्याकडून या सर्व कामगारांना मोठी आशा होती. मात्र या दोघांकडूनही निराशाच पदरी पडली. तर या विषयावर डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ यांनी कामगारांना घेऊन मजूर आयोगाकडे गेल्यानंतर कंपनीने रचलेला डाव कामगारांच्या लक्षात आला आणि कामगरांची बाजू मांडण्यास संधी मिळाली. अन्यथा कंपनीने स्वतःचे सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून कामगारांना इतक्मयात घरीही बसविले असते. त्यासाठी या कामगारांनी माजी आमदार नरेश सावळ यांचे आभार व्यक्त केले.
दरम्यान या विषयी सदर कंपनीच्या एका वरि÷ अधिकाऱयांशी संपर्क साधला असता, कंपनीने उचललेले पाऊल कायदेशीर असल्याचे सांगितले. सध्या सदर प्रकरण मजूर आयोगाकडे असल्याने, त्यावर जास्त भाष्य करण्यास मनाई केली.