ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पातील आगामी योजना जाहीर करताना त्यांनी डोंगराळ भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी रोप-वे सेवेचं प्रमाण वाढवणार असल्याची तसेच 25 हजार किलोमीटरचे नवे रस्ते बांधणार असल्याची घोषणा केली.
सीतारामन म्हणाल्या, देशातील ज्या डोंगराळ भागात हिमवृष्टी अथवा भूस्खलनामुळे रस्तेवाहतुकीवर परिणाम होतो, अशा ठिकाणी रोप-वे चे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. तसेच पीएम गतीशक्ती योजने अंतर्गत वाहतूक आणि वस्तूंचे दळणवळण अधिक सुकर करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्गांचे जाळे आणखी 25 हजार किलोमीटरवर पसरवण्याची योजना आहे. तसेच इतर छोटय़ा स्तरावरील सार्वजनिक सुविधांसाठी 20 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले.