मध्यवर्तीच्या बैठकीत ठराव ः विविध मागण्यांसाठी काढणार भव्य मोर्चा
प्रतिनिधी/ बेळगाव
सीमावासियांचे मार्गदर्शक प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे सीमावासियांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्याने तज्ञ समितीचे अध्यक्षपद रिक्त आहे. त्यामुळे त्या जागी सीमाप्रश्नाची जाण असणारे महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची नेमणूक करावी, अशा मागणीचा ठराव शनिवारी झालेल्या मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला.
केरळ राज्यातील कन्नड नागरिकांनी भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार करताच कर्नाटक सरकार आक्रमक झाले. केरळ सरकारने आपण मल्याळम भाषेची सक्ती करत नसल्याचे स्पष्ट केले. हे एकीकडे असताना दुसरीकडे सीमाभागातील नागरिक 1980 पासून अल्पसंख्याक आयोगाकडे पत्रे पाठवत असून त्याला मात्र दुजाभाव केला जात आहे. सीमाप्रश्नाचा दावा सर्वोच्च न्यायालयात चर्चेला येण्याची शक्मयता असल्याने दिनेश ओऊळकर यांच्यासारख्या स्पेशल ऑफिसरची नेमणूक करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाच्या झालेल्या अवमानाविरोधात रस्त्यावर उतरलेल्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या तरुणांना जामिनावर सुटका करण्यासाठी ऍड. महेश बिर्जे व त्यांच्या सहकारी वकिलांनी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा
कर्नाटक सरकारचा मराठी भाषिकांच्या जमिनींवर डोळा आहे. त्यामुळेच शहरालगतच्या जमिनी बुडा तसेच इतर योजनांच्या नावाखाली हडपण्याचे प्रकार सुरू करण्यात आले आहेत. यामुळे मराठी माणूस देशोधडीला लागणार असून त्यापूर्वीच याला विरोध करण्यासाठी म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी हा भव्य मोर्चा काढला जाणार असून, याची तारीख लवकरच निश्चित केली जाईल, असे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सांगितले.
अरविंद पाटील यांच्याबाबत खानापूर समिती घेणार निर्णय
खानापूर तालुक्मयाचे माजी आमदार अरविंद पाटील हे मागील अनेक दिवसांपासून समितीच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित नाहीत. याबद्दल त्यांना विचारणा केली असता त्यांनी आपण लेखी उत्तर देऊ, असे कळविले होते. परंतु अद्याप त्यांचे उत्तर खानापूर तालुका म. ए. समितीकडे आलेले नाही. त्यामुळे खानापूर येथे घटक समितीची बैठक घेऊन मध्यवर्ती म. ए. समितीला अंतिम निर्णय कळवू, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.