रत्नागिरी/प्रतिनिधी
तरुण भारतच्या रत्नागिरी प्रतिनिधी पत्रकार जान्हवी पाटील यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जान्हवी पाटील यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून हा पुरस्कार देण्यात येतो. आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्याच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.
पत्रकार क्षेत्रासोबत सामाजिक क्षेत्रातील जान्हवी पाटील यांच्या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी जान्हवी पाटील यांचे विशेष कौतुक केले. तुमच्या सारख्या पत्रकारांमुळेच दीनदुबळ्यांची बाजू आम्हाला समजते असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात जान्हवी पाटील यांच्यावर चित्रित केलेली एक चित्रफित देखील दाखवण्यात आली.