डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जयंती निमित्त जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदचे कविसंमेलन उत्साहात
सांगली : प्रतिनिधी
नव्या पीढीने थोर साहित्यकिांच्या कवितांचा अभ्यास करून व तळागाळातील माणसांच्या वेदना आपल्या काव्यातून मांडल्या पाहिजेत. असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक नामदेव भोसले यांनी केले. जिल्ह्यातील थोर साहित्यिका डॉ. सरोजनी बाबर यांच्या जयंतीनिमित्त जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद सांगली जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मलाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी परिषदेच्या मिरज, तासगाव कवठेमहांकाळ तालुका कार्यकारणीतील नवनियुक्त व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
मराठा सेवा संघ सांस्कृतिक सभागृह सांगली येथे प्रारंभी नामदेव भोसले, डॉ. निर्मलाताई पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. साहित्य परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्याध्यक्षा मनिषाताई पाटील यांनी सुत्रसंचालन केले. मिरज तालुका अध्यक्षा मनिषा रायजादे यांनी आभार मानले. यावेळी परिषदेचे जिल्हा सचिव विनायक कदम, संघटक विव अंत पाटील, ऍड. कृष्णा पाटील उपस्थित होते.