बर्लिन
जेव्हा जेव्हा पृथ्वीवरचे तापमान 1 डिग्री वाढेल तेव्हा तेव्हा भारतात मान्सूनचा पाऊस 5 टक्के इतका अधिक होईल असा अंदाज पोटसडॅम इन्स्टिटय़ूट ऑफ क्लायमेंट इम्पॅक्ट रिसर्च(जर्मनी)चे वैज्ञानिक अँडर्स लिव्हरमन यांनी वर्तवला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे भारतात होणाऱया पावसाबाबतचे अध्ययन त्यांनी केले आहे. या अध्ययनातून वरील बाब त्यांनी मांडली आहे. जितक्या वेळा ग्लोबल वॉर्मिंगमुळे 1 डिग्री सेल्सीयस वाढेल तेव्हा तेव्हा भारतात मान्सूनचे प्रमाण 5 टक्के इतके वाढेल, असे अँडर्स लिव्हरमन यांनी म्हटलंय. मान्सूनचा पाऊस हा दरवर्षी बरसत असतो. याचा अंदाज बांधणं सर्वात कठीण काम असतं. त्यांचे यासंदर्भातील अध्ययन स्टडी अर्थ सिस्टम डायनॅमिक्समध्ये प्रकाशीत झाले आहे. भारतात जूनला पाऊस सुरू होतो तो अगदी सप्टेंबरपर्यंत पडत असतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानात वाढ होतच राहणार आहे. भारतात मान्सूनचा पाऊस यावर्षीही धुवाँधार होईल.