जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आणखी दोन तास वाढीव मिळाल्याने समाधान
वार्ताहर / किणये
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून क्लोजडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. शहराबरोबरच तालुक्मयातही या क्लोजडाऊनला उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सकाळपासून दुपारी 12 पर्यंत जीवनावश्यक साहित्याच्या दुकानांना मुभा देण्यात आली असल्यामुळे तालुक्मयाच्या विविध ठिकाणी असलेल्या मुख्य बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी सकाळच्या सत्रात गर्दी दिसून येऊ लागली आहे. दुपारी 12 नंतर क्लोजडाऊनचे काटेकोर पालन करण्यात येत असून सर्व रस्त्यांवर शुकशुकाट पसरत आहे.
क्लोजडाऊनची घोषणा झाल्यानंतर सकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 10 पर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू ठेवण्याचे आदेश दिले होते. यामुळे केवळ चार तासांमध्येच खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत होती. बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेऊन या गर्दीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाने पुन्हा दोन तास वाढीव दिले असून दुपारी 12 पर्यंत ही मुभा दिली आहे.
पिरनवाडी, हिंडलगा, बेळगुंदी, संतिबस्तवाड, कंग्राळी खुर्द, कडोली, बसवण कुडची, सांबरा, हलगा-बस्तवाड, येळ्ळूर, मच्छे आदी परिसरात असलेल्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी सकाळी साऱयांची धावपळ दिसून येऊ लागली आहे. दुपारी 12 नंतर मात्र रस्त्यावर फिरणाऱयांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येऊ लागली आहे. विनाकारण फिरणाऱयांना पोलीस माघारी पाठवून देऊ लागले आहेत.
व्यावसायिकांना मोठा फटका
काही महत्त्वाचे उद्योगधंदे व त्यासंदर्भातील व्यावसायिकांना क्लोजडाऊनमध्येही कामकाज करण्यास परवानगी दिली असल्यामुळे काही कारखानदारांनी आपल्या कामगारांना ओळखपत्रे दिलेली आहेत. या ओळखपत्रांच्या आधारावर छोटेमोठे कामगार क्लोजडाऊनमध्येही कामानिमित्त येऊ लागले आहेत. उद्यमबाग, मच्छे, नावगे, वाघवडे, होनगा आदी परिसरात मोठय़ा प्रमाणात औद्योगिक वसाहती आहेत. यामुळे कामगारांना रोज कामावर यावे लागत आहे. ब्रह्मनगर व पिरनवाडी येथे बॅरिकेड्स उभारले आहेत. रस्त्यावरून येणाऱया प्रत्येक वाहनधारकाची पोलीस चौकशी करीत आहेत. बाचीजवळ पोलीस चेकपोस्ट उभारली असून त्या ठिकाणीही महाराष्ट्रातून येणाऱया प्रत्येक वाहनावर पोलिसांची करडी नजर आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रामार्फत कोरोना लसीकरणाला सुरुवात केली असून लस घेण्यासाठी अनेक जण धावपळ करीत आहेत. काही आरोग्य केंद्रांमध्या लस पुरवठा कमी पडू लागला आहे. त्यामुळे जनतेला पुरेल इतका लससाठा द्यावा, अशी मागणी होत आहे.
कोरोनासंदर्भात जनजागृती
गेल्या आठवडाभरापासून विविध गावांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होऊ लागली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्राम पंचायत, आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी शिक्षिका यांच्याकडून कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.
प्रशासनाच्या नियमावलींचे पालन करून नियमित सॅनिटायझर, मास्कचा वापर व सामाजिक अंतर ठेवून तसेच विनाकारण घराबाहेर न पडता कोरोना रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वांनी सतर्कतेने राहणे गरजेचे आहे.