वार्ताहर / किणये
तालुक्मयाच्या पश्चिम भागात वळीव पावसाने रविवारी पुन्हा हजेरी लावली आहे. रविवारी पहाटे व दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्मयाच्या पश्चिम भागाला अक्षरश झोडपून काढले आहे. यामुळे शेतकऱयांची तारांबळ उडाली होती. वादळी वाऱयासह झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे व भाजीपाला पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.
गेल्या चार दिवसापूर्वी सर्वच भागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. या पावसातही पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. गेल्या दोन दिवसापासून तर उष्णतेमध्ये कमालीची वाढ झाली होती. अखेर रविवारी पहाटे पाऊस झाला त्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती मात्र दुपारी जोरदार पाऊस झाला.
रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते तर दुपारी मेघगर्जनेसह पाऊस झाला असल्यामुळे शेतकऱयांची एकच तारांबळ उडाली होती. अनेक गावांमध्ये होळीच्या सणाची तयारी सुरू असतानाच पावसाने हजेरी लावली असल्यामुळे ग्रामस्थांची ही धावपळ झाली.
मुसळधार मुसळधार पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या ज्वारी कणसांची काढणी सुरू होती. तर काही शेतकऱयांनी शिवारात कडबा (ज्वारी) कापून ठेवले होते. अशातच पाऊस पडला असल्यामुळे ज्वारी पिकाला फटका बसला आहे. मिरची व इतर भाजीपाला पिके ही पावसामुळे आडवी झाली आहेत त्यामुळे शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
तालुक्मयाच्या पश्चिम भागात काजू व आंब्याच्या बागायती मोठय़ा प्रमाणात आहेत .या वादळी वाऱयामुळे काजू व आंब्याची फळे झाडाची तुटून पडली असल्यामुळे बागायतदार शेतकऱयांचे नुकसान झाले असल्यामुळे आता पुढील हंगाम कसा साधावा याची चिंता त्यांना लागून राहिली आहे.
देसुर ,राजहसगड ,नंदीहळी या भागात विटांच्या भट्टय़ा अधिक आहेत. सतत होणाऱया वादळी पावसामुळे वीट व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे .रविवारी झालेल्या वळीवाच्या पावसामुळे वीट वीटभट्टीवर काम करणाऱया कामगारांची बरीच धावपळ झाली. भट्टी लावण्यासाठी काढून ठेवण्यात आलेल्या कच्च्या कच्च्या विटा मात्र पूर्णपणे खराब झाले असल्यामुळे वीट व्यवसायिक हतबल झाले आहेत.