वार्ताहर /लतंबर्सम
नानो डा व लाटं बारसे इतर भागात तिलारीचे पाणी येत नसल्याने शेतकऱयांची नुकसान होत असल्याचे समजताच सभापती यांनी दखल घेताना वरि÷ अधिकारी वर्गाशी चर्चा केली त्यानंतर तातडीने अंमल बजावणी होताना मंगळवारी सायंकाळी नानो डा व इतर भागात पाणी सुरू करण्यात आल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले आहे
माजी सरपंच लाटं बारसे श्याम हरमलकर शेतकरी प्रमोद गाड,जयेंद्र केरकर अनिल जोशी आदींनी शेती साठी पाणी नियमित पुरवले नाही तर या पाण्याच्या भरवशावर असलेली शेती करपेल त्यामुळे त्याची दखल नियमित घेतली जावी अशी मागणी केली आहे
लाटं बारसे भागातील काही कालवे अजून साफ करण्याची गरज आहे ते संबंधित अधिकारी वर्गाने लक्ष देऊन चालना द्यावी अशी मागणी श्याम हरमलकर यांनी केली आहे
सरकारच्या विनंतीला मान देवून शेतकऱयांनी मोठय़ा प्रमाणात पडीक असलेली जागेचे शेती बागायतीत रूपांतरित करून जागा कसून भात शेती बरोबर बागायत मिरची भाज्यांची मोठय़ा प्रमाणात लागवड केली आहे. परंतु ऐन लागवडीच्या वेळी तिलारी कालव्याचे पाणी न सोडल्याने किंवा गायब झाल्याने परिसरातील नानोडा व इतर भागातील शेतकरी चिंतेत .असतात या दिवसात शेतकरी मोठय़ा प्रमाणात मिरची लागवड तसेच इतर भाज्यांची लागवड करीत असतात काही शेतकरी बागायातीचे पीक त्यामध्ये पोफळी, केळी या पिकांची मोठय़ा प्रमाणात लागवड केलेली आहे परंतु पाणीच नसल्याने पिकांची नासाडी होते
तिलारी पाणी पुरवठय़ासाठी गोव्याकडून विशेष तक्रार नाही मात्र महाराष्ट्रातून कालवे गळती ही नित्याचीच बाब असल्याने सतत पुरवठा ठप्प होत असतो त्यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे
ऑक्टो?बर या महिन्यापासून शेतकरी मेहनत घेवून मिरची व इतर भाज्यांची लागवड मोठय़ा प्रमाणात करीत असतात अशमुळे नुकसानी सोसावी लागत आहे.
सदर कालव्याची दुरुस्ती अथवा साफसफाई झाली नसुन उपलब्ध माहितीनुसार साफसफाईचे काम राष्ट्रीय ग्रामीण यंत्रणेला दिलेले आहे त्यांनीही कालवा साफसफाई करण्यासाठी अजून तसदी घेतलेली दिसत नाही साफसफाई अथवा दुरुस्ती न झाल्याने झाडे झुडपे वाढलेली आहे. नानोडा या भागात मोठय़ा प्रमाणात शेतकरी पावसाळी पिकाबरोबरच भाज्यांचे पीक घेत असून. ऑक्टोबर महिन्यापासून इकडचे शेतकरी मिरची तसेच भाज्यांची लागवड करीत असतात. ऑक्टोबर महिन्यापासून शेतकऱयांना लागवडीसाठी पाण्याची गरज भासते परंतु फेब्रुवारी महिना संपत आल शेतकऱयानी वेळोवेळी पाणिअधूनमधून पाणी गायब होत असल्याने अडचण येते असे प्रमोद केळकर, अनिल जोशी, जयेंद्र केरकर, प्रमोद गाड, रामा म्हावलिंगकर, वासुदेव गाड यांनी सांगितले