प्रतिनिधी/ दापोली
राज्य परिवहन महामंडळाची बस व दोन दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात आई व मुलगा जागीच ठार तर अन्य दोघे जखमी झाले. दापोली तालुक्यातील वळणे येथे बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला.
दाभोळहून दापोलीकडे जाणारी बस व समोरून येणारी दुचकी यांच्यात वळणे पुलानजीक समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीवरील आकाश बोर्जे (21) व त्याची आई मीनाक्षी (45) या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. याचवेळी मागून येणाऱया अन्य दुचाकी या गाडय़ांवर धडकली. यामध्ये देवके येथील विलास गोरीवले (60) व त्यांचा मुलगा निलेश (35) हे जखमी झाले आहेत. अपघात टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करताना बस चालकाने नजीकच्या शेतात बस उतरवली.
अपघातानंतर दोन्ही दुचाकी एकमेकावर पडल्या होत्या. त्याखाली दोन्ही मृतदेह दबून बराच वेळ घटनास्थळीच पडून होते. जोरदार पाऊस व लॉकडाऊनमुळे या मार्गावर तुरळक वाहतूक सुरू असल्याने तातडीने मदत उपलब्ध होऊ शकली नाही. ग्रामस्थ व काही वाहनचालकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र बोर्जे माय-लेकांना मृत घोषित करण्यात आले. तर देवके येथील गोरीवले पिता-पुत्रांवर उपचार सुरू आहेत.
यातील जखमी वडील व मुलाला जेव्हा रुग्णालयात आणले तेव्हाच मीनाक्षी बोर्जे व आकाश बोर्जे यांना रुग्णालयात आणले असते तर त्यांचा जीव वाचला असता असे देखील काही ग्रामस्थांनी सांगितले अपघात झाल्यानंतर त्यांचे मृतदेह बराच वेळ घटनास्थळी पडून राहिल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी पत्रकारांशी बोलताना केला. या घटनेनंतर वळणे व देवके येथील ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली यातील मृत्यू मीनाक्षी बोर्जे या दापोली येथे दररोज कामासाठी येत असत त्यांना घरी नेण्यासाठी त्यांचा मुलगा आकाश हा दापोलीत आला होता तो आपल्या आईला घेऊन वळणे गावात निघाला असता बुधवारी दुपारी हा अपघात झाला.
आकाश हा अत्यंत मनमिळावू वृत्तीचा व हुशार विद्यार्थी तसेच सायन्सच्या शेवटच्या वर्षाला असणारा हरहुन्नरी व खेळाडू वृत्तीचा होता त्याच्या जाण्याने त्याच्या वळणे गावावर व मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे यातील जखमी असणारे विलास गोरीवले व निलेश गोरीवले हे मूळचे देवके येथील असले तरी ते मुंबई येथे नोकरी करतात सध्या मुंबई हा रेट झोन जाहीर करण्यात आला आहे शिवाय मुंबई असणाया नोकया देखील हातातून गेल्या आहेत यामुळे हे पितापुत्र दापोलीमध्ये आलेले आहेत ते देखील दापोलीतून आपले काम उरकून बुधवारी आपल्या गावी देवके येथे निघाले होते यावेळी यांचा यांच्या गाडीला वळणे येथे अपघात झाला त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
चौकट
वळणे येथे ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी या आधी देखील अपघात झालेले आहेत या एका वर्षात येथे तब्बल पाच अपघात झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली या ठिकाणी गतिरोधक लावण्याची मागणी देखील आता ग्रामस्थ करत आहेत.