विजयवाडा / वृत्तसंस्था
आंध्र प्रदेश राज्यासाठी 3 राजधान्या निर्माण करण्याची वादग्रस्त योजना त्या राज्याने मागे घेतली आहे. सोमवारी आंध्रच्या विधानसभेत तीन राजधान्यांच्या योजनेच्या विरोधातील प्रस्ताव संमत करण्यात आला. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी काही महिन्यांपूर्वी तीन राजधान्यांचा कायदा केला होता. तथापि याविरोधात जनतेत क्षोभ निर्माण झाल्याने हा कायदा रद्द करण्यात आला आहे. हा कायदा मागे घेण्याचा प्रस्ताव विधानसभेत अर्थमंत्री राजेंद्रनाथ रेड्डी यांनी मांडला. तो विधानसभेने एकमताने संमत केला, अशी माहिती देण्यात आली.