गर्दी टाळण्यासाठी पंचकमिटीचा निर्णय : भाविक पै-पाहुण्यांना आवाहन
वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुक्मयातील हत्तरवाड येथे दरवषी होणाऱया ‘एक गाव एक तुळस’ या सामूहिक विवाह कार्यक्रमाचे यावषी येत्या सोमवार दि. 29 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. परंतु दरवषीप्रमाणे होणाऱया या उत्सवावर यावर्षी कोरोनाचे विरजण पडले असून केवळ पंचकमिटीच्या उपस्थितीत यावषीचा सामूहिक तुळशी विवाह सोहळा पार पडण्याचा निर्णय ग्रामस्थ, पंचकमिटीने घेतला आहे. तरी या विवाह सोहळय़ास भाविकांसह पै पाहुणे अथवा नवसफेड करणाऱया भाविकांनी उपस्थित राहू नये, असे आवाहन हत्तरवाड ग्राम पंच कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
गेल्या सहा महिन्यापासून कोरोना महामारीमुळे झालेल्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेता तसेच पुन्हा प्रादुर्भाव वाढण्याची दक्षता लक्षात घेता, गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पंच कमिटीने हा निर्णय घेतला आहे. दरवषी या ठिकाणी होणारा सामूहिक तुळशी विवाह सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. नवसाला पावणारी तुळशी देवता म्हणून या सोहळय़ाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अनेक भाविक तुळशीविवाह संपन्न झाल्यानंतर आपला नवसफेड अथवा नैवेद्य आधी कार्यक्रम करतात. त्यामुळे मोठी गर्दी झालेली असते. याकरिता यावषीचा सामूहिक तुळशी विवाह मर्यादित लोकांच्या व पंच कमिटीच्या उपस्थितीत पार पाडण्याचा निर्णय पंचकमिटीने घेतला आहे. तरी या तुळशी विवाह सोहळय़ाला येणाऱया तालुक्यातील व गाव परिसरातील सर्व भाविक व पाहुण्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हत्तरवाड येथे पूर्वापार गावच्या मध्यभागी असलेल्या तुळसी वृंदावनाचे महत्त्व वेगळे आहे. या उत्सवाला गावातील सर्व माहेरवासीय सुवासिनी गावी एकत्र आलेले असतात. भक्तांच्या नवसाला ही तुळशी वृंदावन पावते, असा विश्वास आहे. त्यामुळे जिल्हय़ातील अनेक गावातून संतान प्राप्ती, संकट निवारणासाठी देवीला नवस मागण्यासाठी मोठय़ा संख्येने सोहळय़ाला भक्तजण उपस्थित राहतात. विशेषत: महिलांची उपस्थिती मोठी असते. यावषी मात्र कोणीही बाहेरील पै पाहुण्यांनी उपस्थित न राहण्याचे आवाहन करण्यात आले असून सोमवारी रात्री 9 नंतर गावातील प्रमुख हक्कदार, वतनदार, पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा होणार आहे.