ऑनलाईन टीम / मुंबई :
घाटकोपर असल्फा येथून उघड्या गटारात पडून वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह अखेर आज हाजीअलीच्या समुद्रात सापडला आहे. शीतल भानुशाली असे या महिलेचे नाव आहे.
दोन दिवसांपासून ही महिला बेपत्ता झाली होती. मुंबईत आलेल्या मुसळधार पावसादरम्यान नाल्याच झाकण उघड राहून त्यात ती पडल्याची भीती वर्तवण्यात येत होती.अखेर पावसात वाहून गेल्याचा स्थानिकांचा अंदाज खरा ठरला.
असल्फा मेट्रो खाली आणि आजू बाजूच्या परिसरात असलेल्या गटारात काल शोधकार्य सुरू होते. मात्र मुंबई महानगर पालिका, अग्निशमन दल आणि पोलीस यांना त्यात यश मिळाले नाही. दरम्यान काल रात्री ताडदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाजीअल्ली येथील समुद किनारी महिलेचा शव आढळून आले.
शीतलच्या घरच्यांना तिचे दागिने आणि कापड्यांवरून ओळख पटली. गटाराचे झाकण पावसाने उघडले असावे आणि त्यातून ही महिला वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. शीतल भानुशाली ही असल्फा येथील चाळीत राहत असून दळण आणायला गेली होती त्यानानंतर ती घरीच परतलीच नाही. अखेर शीतलचा मृतदेह आज सापडला.