ऑनलाईन टीम / मुंबई :
टीईटी (टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट) उत्तीर्ण नसलेल्या प्राथमिक शिक्षकांना नोकरीतून काढून त्याजागी टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची नेमणूक करा, असे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्पष्ट केले आहे.
मुलांना पात्र शिक्षकांकडून दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई कायद्यानुसार प्राथमिक शिक्षकांसाठी ‘टीईटी’ अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना नोकरीत न ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच उच्च न्यायालयाने घेतला होता. त्यावर उच्च न्यायालयाने टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना नोकरीवरुन काढावेच लागेल आणि त्याजागी टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची नेमणूक करावी लागेल असे राज्य सरकारला स्पष्ट केले.
तसेच या शिक्षकांना शाळेने कामावर ठेवले तरी सरकारने त्यांचे पगार जनतेच्या पैशातून करता कामा नयेत, असेही उच्च न्यायालयाने सांगितले आहे.