वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या कारणामुळे देशातील लहान मध्यम व्यवसाय मोठय़ा प्रमाणात अडचणीत सापडले आहेत. यामध्ये सर्वाधिक मोठा फटका हा लॉजिस्टिक्स कंपन्यांना बसणार आहे. यामध्ये या क्षेत्रातील दिग्गज क्हिआरएल लॉजिस्टिक कंपनी चालू वर्षात आपली 15 टक्के वाहने स्क्रॅपमध्ये घालण्याची योजना आखत आहे. तसेच ऑगस्ट महिन्यात भाडय़ाचे दर ही 10 टक्क्मयांनी घसरले आहेत आणि मोरोटॉरियमचा कालावधीही समाप्त झाल्याने लॉजिस्टिक्सची स्थिती आणखी वाईट होण्याचे संकेत असल्याने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
व्हिआरएल लॉजिस्टिक देशात आपला लॉजिस्टिकचा व्यवसाय करत असलेली मोठी कंपनी आहे. सदरच्या कंपनीचा व्यवसाय हा एसएमई आणि एमएसएमईच्या माध्यमावर अवलंबून असतो. परंतु यावेळी कंपनीने नवीन वाहन खरेदीचा विचार केलेला नाही. तर कंपनी जवळपास 5 हजार मोठी वाहने वापरत असून व्यवसायातील मंदीमुळे कंपनी यावेळी जुनीच वाहने दुरुस्त करुन वापर करणार आहे. यातील जवळपास 700 ट्रक स्क्रॅपसाठी निवडले असल्याचे कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी सुनील नलवाडी यांनी म्हटले आहे.
ट्रक विक्री घटली
ट्रक निर्मिती क्षेत्रातील कंपनी डेमलर एजी यांच्या माहितीनुसार भारतामध्ये ट्रकच्या विक्रीच्या आकडय़ात सुधारणा होण्यासाठी कमीत कमी तीन वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.