दिघंची/वार्ताहर
दिघंची ते पुजारवाडी (दि) रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आले असून यासाठी आमदार अनिलभाऊ बाबर व तानाजीराव पाटील यांच्या प्रयत्नामधून साडे तीन कोटी रुपये निधी उपलब्ध झाला होता.अशी माहिती पुजारवाडी (दि) च्या सरपंच अनिता ब्रह्मदेव होनमाने यांनी दिली.
पुजारवाडी (दि) ते दिघंची हा रस्ता व्हावा यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होती.या राज्यमार्गासाठी आमदार अनिल भाऊ बाबर व तानाजीराव पाटील यांच्या प्रयत्नामधून सुमारे साडे तीन कोटी रुपये एवढा मोठा निधी मंजूर झाला हित. काम आज पूर्णत्वाकडे असून या रस्त्यामुळे मुळे अकलूज जाताना 20 की.मी.चे अंतर व वेळ वाचणार आहे त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या राज्य महामार्गाचे काम झाल्यामुळे पुजारवाडी (दि) सह बचेरी, इटकी या परिसरातील दळणवळण सुविधेचा चालना मिळणार असून अकलूज कडे जाताना प्रवाशांचे तब्बल 20 किलोमीटर एवढे अंतर वाचणार आहे.