ममतांचा विजय हा बंगालपुरता मर्यादित नसून कोविड महामारीने आणलेल्या त्सुनामीच्या पार्श्वभूमीवर त्याला एक मोठे राष्ट्रीय परिमाण प्राप्त झाले आहे. स्ट्रीट फायटर म्हणून प्रख्यात असलेल्या दीदी आता मोदी-शहा यांना जंग जंग पछाडणार आहेत.
पाच राज्यांच्या निवडणुकात सर्वात महत्त्वाची निवडणूक ही बंगालची होती. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांना अक्षरश धूळ चारून ममता बॅनर्जी यांनी भाजपला भयानक हादरा दिलेला आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून झालेल्या राज्यातील सर्व निवडणुकात त्यांना बंगालचा पराभव कायमचा सलत राहील. गेल्या लोकसभा निवडणुकात राज्यातील 42 पैकी 18 जागा जिंकून भाजपने विधानसभेत तृणमूल काँग्रेसला पूर्ण खतम करण्याचाच विडा उचलला होता. ‘आज हाफ, कल साफ’ अशी घोषणा देत मोदी-शहा यांनी साम दाम दंड भेद असे सारे प्रकार वापरून ममतांना खिळखिळे करण्याचा जंगी डाव खेळला होता. ममतांच्या पक्षाला वारंवार खिंडार पाडून मोदी-शहा हे शड्डू ठोकत राहिले. या निवडणुकांनी भाजपा ही बंगालकरता ‘उपरी’ आहे हे ममतादीदीनी दाखवून दिले आहे. तामिळनाडू, केरळ आणि आसाममधील निकाल हे अपेक्षेप्रमाणे आहेत. महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवून भाजप लढली होती. आसाममध्ये मात्र मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना त्याने नेता जाहीर केले नव्हते. आता भाजपच्या आसाममधील विजयानंतर सोनोवाल आणि जे÷ नेते हिमंत बिस्वा शर्मा यामध्ये पक्ष दुभंगला जाण्याची शक्मयता वर्तवली जात आहे ती चुकीची वाटत नाही. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अजून राजकारणात खूप शिकायचे आहे असेच या निकालांनी जाणवते. केरळ आणि आसाममध्ये त्यांनी स्थानिक नेत्यांना पुढाकार न देता केंद्रीय नेत्यांना दिला आणि त्यामुळे सारे गणित बिघडले.
ममतांचा विजय हा बंगालपुरता मर्यादित नसून कोविड महामारीने आणलेल्या त्सुनामीच्या पार्श्वभूमीवर त्याला एक मोठे राष्ट्रीय परिमाण प्राप्त झाले आहे. स्ट्रीट फायटर म्हणून प्रख्यात असलेल्या दीदी आता मोदी-शहा यांना जंग जंग पछाडणार आहेत. दहा वर्षे बंगालमधील सत्ता चालवल्यावर आता भाजपला सळो की पळो करण्याचे राजकारण त्या करणार. महाराष्ट्राच्या दृष्टीने बघायचे झाले तर ममता काँग्रेसमध्ये असताना शरद पवारांना आपला नेता मानायच्या हे विसरून चालणार नाही. उद्धव ठाकरे आणि ममतादीदी यांचे राजकारणातील सख्य जुने आहे.
कोरोनाच्या हैदोसाने दिल्ली हादरली
हजारोनी जळणारे मृतदेह. दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरात जाळण्याकरता लाकडे मिळेनाशी झाली आहेत एवढा प्रेतांचा लोंढा वाढला आहे. कोरोनाच्या हैदोसामुळे देशाला काय काय बघायला लागत आहे किंवा लागणार आहे याचे प्रतिबिंब इथल्या हृदयविदारक चित्रांनी मिळत आहे. इस्पितळाबाहेरील एका छायाचित्रात एक घाबरलेली प्रौढ स्त्री एका ऑटोरिक्षामध्ये आपल्या नवऱयाला कृत्रिम श्वासोछ्वास देऊ लागली पण त्यावरील यमाचा घाला रोखू शकली नाही. सती सावित्री आता राहिल्या नाहीत असे नाही पण यमदेवाची धर्म परायणता कोठेतरी कमी पडू लागली की काय अशी शंका येऊ लागली आहे. सारे काही उफराटे घडत आहे. साक्षात कलियुग आहे. ज्याने त्याने समजून घ्यायचे. कोण यमदूत आहे आणि कोण देवदूत आहे.
दिल्लीतील सामान्य माणसाची कोठे काय पत्रास लागणार जेव्हा राजधानीतील पॉवरफुल समजले जाणारे पत्रकार जगतच शेळी मेंढी झाले आहे. किमान 50 ते 60 पत्रकार कोरोनाच्या महामारीला बळी पडले आहेत अथवा आपली शेवटची घटका मोजत आहेत. हा आकडा वाढत चालला आहे आणि त्यात फक्त वृद्ध नसून काही अतिशय तरुण आहेत. काही महिन्यांपूर्वी पत्रकार संघटनांनी मोदी सरकारला विनंती केली होती की कामानिमित्त पत्रकारांना सगळीकडे जावे लागत असल्याने त्यांना ‘प्रंट लाईन हेल्थ वर्कर’ प्रमाणे प्राधान्याने लसीकरण करवावे. अशा निर्णयामुळे सरकारला फार खर्च आला नसता तरीही या विनंतीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. आता सरकारला खडबडून जाग आलेली दिसते कारण येत्या आठवडय़ापासून असे लसीकरण सुरू होईल. दिल्ली हे देशभरच्या शेकडो इलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनेलचे केंद्र आहे आणि त्यातील शेकडो पत्रकार-गैरपत्रकार अगोदरच बाधित झालेले आहेत.
दिल्लीमध्ये संघाचे प्रांत प्रमुख राहिलेल्या एका मोठय़ा नेत्याने राजधानीत एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर जागोजागी संकट दिसत असताना राज्य भाजपमधील कार्यकर्ते रस्त्यावर का बरे दिसत नाही? भाजप गायब झाली आहे काय अशी पृच्छा करून सत्ताधारी पक्षातील अकार्यक्षमतेला वाचा फोडली आहे. दिल्ली भाजपमधील प्रस्थापित नेत्यांना बाजूला करून आपल्या मर्जीतील मंडळी गृह मंत्री अमित शहा यांनी बसवली आहेत अशी चर्चा वाढीस लागली आहे. लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याची फारशी परंपरा अलीकडील काळात नसलेल्या राष्ट्रीय युवक काँग्रेसने मदत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करून सर्वांची वाहवाही घेणे सुरू केले आहे. गमतीची गोष्ट अशी की परदेशी दूतावासदेखील कठीण प्रसंगी मदतीसाठी युवक काँग्रेसला पाचारण करत आहेत. न्यूझीलंड दूतावासात एक वरि÷ अधिकारी अत्यवस्थ झाला तेव्हा त्यांनी सरळ युवक काँग्रेसच्या हेल्पलाईशी संपर्क साधला आणि काही मिनिटातच कार्यकर्ते तिथे प्राणवायूचे तीन सिलेंडर देऊन आले. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ज्या हडेलहप्पीने वागत आहेत त्याने राज्य भाजपमधील असंतोष दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईत परिस्थिती बरीच आटोक्मयात आणल्याबद्दल जे÷ भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. स्वामी यांना न बोलता मोदी-शहा यांना कानपिचक्मया द्यायच्या आहेत. तात्पर्य काय तर कोरोनाच्या त्सुनामीने धार्मिक ध्रुवीकरणाच्या बाटलीत घालून ठेवलेले भूत आता थोडे कुचकामी होत आहे आणि ‘मरता क्मया नही करता’ या न्यायाने प्रत्येकजण हातपाय मारत आहे, मारणार आहे.