सामान्य व्यवहारात माणसांनी एकमेकांशी चांगले वागावे अशी अपेक्षा असते. म्हणजेच उगीचच दुसऱयाच्या खाजगी आयुष्यात डोकावणे, जाणूनबुजून उपद्रव करणे, भांडणे उकरून काढणे इ. गोष्टी करू नयेत अशी अपेक्षा असते. बरीच माणसे ते पाळतातही. पण काही खलप्रवृत्तीच्या माणसांना साधेसरळ वागणे पटत नाही. दुसऱयाला त्रास झाला की, त्यांना आनंद होतो. आसुरी आनंद. त्यांनाच सुभाषितकार दुर्जन म्हणतात. त्यांनी सज्जन प्रशंसेबरोबरच दुर्जनांची निंदा केली आहे. दुर्जन कसे असतात, त्यांच्याशी शहाण्या माणसाने कसे वागावे याबद्दल अनेक श्लोक आहेत. उदाहरणार्थ हा श्लोक पहा. दुर्जनः परिहर्तव्यो विद्ययालंकृतोएपि सन्। मणिना भूषितः सर्पः किमसौ न भयंकरः।। अर्थ -विद्याविभूषित असला तरीसुद्धा त्या दुर्जनाला नेहमी टाळावे. ज्याच्या डोक्मयावर मणी आहे तो सर्पदेखील भयंकर नसतो का? दुष्ट प्रवृत्तीची माणसे कितीही विद्याविभूषित असली तरी त्यांचा दुष्टपणा जात नाही. ती अधिक भयंकर असतात. जसा रावण वेदविद्याविभूषित, विद्वान होता, तरी त्याने सीताहरण केले, रामाशी वैर पत्करले, उन्मत्त झाला. दुर्योधनही बुद्धिमान होता, पण दुष्ट प्रवृत्तीचा होता. म्हणून पांडवांना लाक्षागृहात जाळून टाकण्यापर्यंत त्याची मजल गेली. द्रौपदीचे वस्त्रहरण झाले, अनेक कटकारस्थाने केली. म्हणूनच अशा दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांना नेहमी टाळावेच. ही दुर्जन माणसे आपला हेतू साध्य करण्यासाठी कशी वागतात ते सांगणाराही एक श्लोक आहे. दुर्जनः प्रियवादी च नैतद्विश्वासकारणम्। मधु ति÷ति जिव्हाग्रे ह्रदये तु हलाहलम्।। अर्थ:-गोड बोलणाऱया दुर्जन माणसावर कधीही विश्वास ठेवू नये. कारण त्यांच्या जिभेवर मध, तर ह्रदयात हलाहल (विष) असते. वरवर गोड बोलणारी माणसे आपले काम झाले, हेतू साध्य झाला की, आपले खरे रूप दाखवतात. विश्वासघात करतात. ‘केसाने गळा कापणे’ हे त्यांना चांगले जमते. ह्या माणसांना दुसऱयाचे दोष पटकन दिसतात. लोकांना सतत नावे ठेवतात. स्वतःचे दोष त्यांना दिसत नाहीत. किंबहुना त्यांना कोणी ते दाखवलेले आवडत नाही. म्हणूनच मराठीत म्हणतात, ‘निंदकाचे घर असावे शेजारी!’ अर्थात सकारात्मक अर्थ घेतला, तर आपले दोष समजण्यासाठी, सुधारणा होण्यासाठी अशा लोकांकडे पहावे. म्हणूनच संस्कृत सुभाषितकार म्हणतात, ‘दुर्जनं प्रथमं वन्दे सज्जनं तदनंतरम्।’ आधी दुर्जनाला नमस्कार करा, मग सज्जनाला. माशी, सर्प, विंचू यांच्या एखाद्या अवयवात विष असते, पण दुर्जनांच्या ते सर्वांगात असते असे सुभाषितकार म्हणतात, ते अगदी खरे आहे! तुम्हालाही असाच अनुभव येत असेल ना? व्यावहारिक संस्कृत सा गच्छति। ती जाते. सः आगच्छति। तो येतो. सः क्रीडति। तो खेळतो.सा पश्यति। ती पाहते. एषःखादति। हा खातो.एषा हसति। ही हसते. एतत् पिबति। हें पितें.भवान्/भवती लिखति। आपण (आदरार्थी-तुम्ही) लिहिता.
Previous Articleवीर नव्हे हा सामान्य
Next Article कोरोना नियंत्रणासाठी सहकार्य करा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.