218 ग्राम पंचायतीतून 3 हजार 936 सदस्यांसाठी होणार निवडणूक
प्रतिनिधी/ बेळगाव
दुसऱया टप्प्याच्या निवडणुकीसाठी 13 हजार 636 अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीसाठी शनिवार दि. 19 रोजी अर्ज माघारीच शेवटचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 218 ग्राम पंचायतीच्या 3 हजार 936 सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे.
दुसऱया टप्प्यामध्ये सौंदत्ती, रामदुर्ग, चिकोडी, निपाणी, अथणी, कागवाड, रायबाग या तालुक्मयातील ग्राम पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. दि. 27 रोजी मतदान होणार असून 30 रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळी कागवाड आणि निपाणी हे दोन तालुके वाढले असून त्यामध्ये काही गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्या ठिकाणीही मोठी चुरस निर्माण झाली आहे.