मुंबई
दूरसंचार कंपन्यांना येत्या 31 मार्चच्या अगोदर एजीआरची 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. भारती एअरटेल, व्होडाफोन आयडियासह अन्य दूरसंचार कंपन्यांसहीत त्यांना पेमेंट करणे आवश्यक आहे, अशी माहिती दूरसंचार विभागातील सूत्रांनी दिली आहे. सर्वेच्च न्यायालयाकडून दूरसंचार कंपन्यांना एजीआरचे पेमेंट करण्यासाठी दहा वर्षांचा कलावधी दिला आहे. दूरसंचार विभागाच्या (डीओटी) सूत्रांनी म्हटले आहे की, कंपन्यांना चालू वर्षात एजीआरची थकबाकीतील काही हिस्स्याची रक्कम भरावी लागणार आहे. तसेच त्यांनी सदरच्या थकबाकीमधील एजीआरची 10 टक्के रक्कम 31 मार्चपर्यंत भरावी लागणार आहे.
मार्चपर्यंत भरावयाचे पेमेंट
चालू वित्त वर्षातील अंतिमपर्यंत या दूरसंचार कंपन्यांना एजीआरचे थकीत रक्कमेच्या रुपाने कमीत कमी 12,921 कोटी रुपयांचे पेमेंट करावे लागणार आहे. यामधील 80 टक्के रक्कम भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाला भरावी लागणार आहे. 1 सप्टेंबरला न्यायालयाने कंपन्यांना 31 मार्च 2021 पर्यंत 10 टक्के रक्कम भरण्यास सांगतानाच पुढील शिल्लक रक्कम 10 वर्षापर्यंत भरण्यासंबंधी स्पष्ट केलेले आहे.