ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानात शनिवारी रात्री अचानक संपूर्ण देशभरातील वीज गेली. त्यामध्ये कराची, लाहोर, पेशावर, इस्लामाबाद, मुल्तान, रावळपिंडी या महत्वाच्या शहरांचाही समावेश होता.पाक सरकारमधील मंत्री शेख रशीद यांनी याप्रकरणी भारतावर हस्यास्पद आरोप केला आहे. भारताने दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून जगाचे लक्ष्य हटविण्यासाठी पाकची वीज घालवल्याचे रशीद यांनी म्हटले आहे.
रशीद यांनी अनेकदा अशा प्रकारची वक्तव्ये केली असल्याने पाकचे जगात हसू होत आहे. त्यामुळे पाकच्या उर्जामंत्र्यांनी ट्रान्समिशन सिस्टममध्ये फ्रीक्वेंसी अचानक 50 पासून 0 झाल्याने देशव्यापी ब्लॅकआऊट झाला असल्याचे ट्विट करून स्पष्ट केले.
शनिवारी रात्री 11.41 वाजण्याच्या सुमारास पाकमधील वीज गेली. देशभरात टप्प्याटप्प्याने वीज पूर्ववत करण्यात येईल, असे ऊर्जामंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे.