ऑनलाईन टीम / मुरादाबाद :
सध्याची परिस्थिती पाहता देशात दोनच मुले जन्माला घालण्याचा कायदा असणे आवश्यक आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, सध्या देशातील लोकसंख्या वाढ हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे भारतात दोनच मुले जन्माला घालण्याचा कायदा होणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या कायदा आणल्यास लोकसंख्या नियंत्रणात येईल. या कायद्यासाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आग्रही असेल. त्यासाठी देशात जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे.
तसेच सुधारित नागरिकत्व कायदा हा कोणाचेही नागरिकत्व हिरावणारा नाही. त्यामुळे या कायद्यावरुन मागे हटण्याची गरज नाही असेही ते म्हणाले. राम मंदिर ट्रस्ट स्थापन झाल्यावर संघ राम मंदिराच्या मुद्यापासून वेगळा होईल आणि लवकर राम मंदिराची निर्मिती होईल, असेही त्यांनी सांगितले.