ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात लोकसंख्या नव्हे, तर बेरोजगारी ही मुख्य समस्या असल्याचा पलटवार एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर केला आहे.
मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात बोलताना देशातील लोकसंख्या वाढ हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे भारतात दोनच मुले जन्माला घालण्याचा कायदा होणे आवश्यक आहे, असे म्हटले होते. त्यावर ओवैसी यांनी भागवतांवर पलटवार केला आहे.
औवेसी म्हणाले, देशात लोकसंख्येची नाही तर बेरोजगारी समस्या मोठी आहे. लोकसंख्येबाबत भाष्य करणाऱयांनी किती लोकांना किती नोकऱया दिल्या ते सांगावे, त्यानंतरच त्यांनी लोकसंख्येवर भाष्य करावे. सध्या देशात बेरोगारांची संख्या लक्षणी य आहे. त्याचा विचार होताना दिसत नाही 2018 मध्ये दररोज सरासरी 36 मुलांनी आत्महत्या केली. त्यावर भागवतांचे मत काय, असाही सवाल ओवैसी यांनी भागवतांना केला आहे.