वार्ताहर/ बोरगाव
जांभळी येथे पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या विवाहिताने दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सुप्रिया शिवाजी भोसले (वय 24), मृण्मयी (वय 5), मृणाली (वय 4) असे त्या मायलेकींची नावे आहेत.
मंगळवारी सकाळी जांभळी ओढय़ालगत आनंदा राऊ चव्हाण यांच्या गट नंबर 349 मधील सामाईक क्षेत्रात असणाऱया विहिरीत एक मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांनी घटनास्थळाकडे जाऊन पाहणी केली. दरम्यान, पती शिवाजी भोसले याने सोमवारी पत्नी व दोन मुली बेपत्ता झाल्याची वर्दी शिरोळ पोलिसात दिली होती. दोन मृतदेह शोधण्यासाठी वजीर रेस्क्मयू फोर्स व स्थानिक युवकांना पाचारण करण्यात आले. विवाहितेने मुलींसह आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. दोन मुलींसह आईने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे परिसर व गावात हळहळ व्यक्त होत आहे. संबधित महिला सोमवारी दुपारी अंगणवाडीला जाऊन येतो असे सांगून दोन मुलींना घेऊन घरातून बाहेर पडली. मात्र, त्या तिघी सायंकाळपर्यंत घरी परतल्या नाहीत. पोलिसांनी ग्राम पंचायतीचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता एक महिला दोन मुलींसह पिराच्या मळय़ाकडे जाताना निदर्शनास आली होती.