पाणी निचरा करण्यासाठी शेतकऱयांनी घेतला पुढाकार
प्रतिनिधी/ बेळगाव
बळ्ळारी नाल्यावरील पुलांचे रुंदीकरण तसेच बांधणी योग्य प्रकारे झाली नसल्यामुळे त्याचा फटका शेतकऱयांना बसू लागला आहे. दरवषी अनगोळ, शहापूर, वडगाव, जुने बेळगाव या परिसरातील शिवाराला मोठा फटका बसत आहे. यातच हलगा-मच्छे बायपाससाठी माती टाकल्यामुळे धामणे रस्ता परिसरात परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होणे कठीण झाले होते. मंगळवारी वडगाव परिसरातील शेतकऱयांनी कंत्राटदाराला सूचना करून पाणी जाण्यासाठी वाट करून दिली. यामुळे शेतकऱयांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बळ्ळारी नाल्यावर बांधण्यात आलेले पूल योग्य प्रकारे बांधले गेले नाहीत. नियोजन नसल्यामुळे शेतकऱयांना त्याचा फटका दरवषीच बसू लागला आहे. बळ्ळारी नाल्यात जलपर्णी आणि गाळ साचला आहे. मध्यंतरी शेतकऱयांनी स्वखर्चाने गाळ काढला होता. धामणे रस्त्यावरील ते पूल अतिवृष्टीमुळे कोसळले होते. त्या पुलांची रुंदी वाढविण्यासाठी तात्पुरता निधी मंजूर करण्यात आला होता. ठेकेदारांनी कामही सुरू केले. मात्र त्याचे नियोजनच करता आले नाही. त्याचा फटका आता रब्बी पिकाला बसू लागला आहे.
धामणे रस्त्यावरील त्या पुलाजवळील पाणी निचरा होऊन पुढे जात नव्हते. त्यामुळे रब्बी पेरणी करणे अशक्मय झाले आहे. बऱयाच दिवसांपासून पाणी तसेच साचून होते. त्यामुळे मंगळवारी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, रयत संघटनेचे अध्यक्ष हणमंत बाळेकुंद्री, आनंदा जुवेकर, बाळू आजरेकर, परशराम धामणेकर यांच्यासह इतर शेतकऱयांनी कंत्राटदाराला सांगून बाजूने चर मारली. त्यामुळे आता पाण्याचा निचरा काही प्रमाणात झाला आहे. यामुळे येत्या आठ-दहा दिवसात काही जमीन रब्बी पेरणीस उपलब्ध होईल, अशी आशा शेतकऱयांनी व्यक्त केली आहे.