ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील चोवीस तासात 11 हजार 119 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख 15 हजार 477 वर पोहचली आहे, तर कालच्या दिवसात तब्बल 422 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, त्यातच दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी एका दिवसात 9356 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे आतापर्यंत 4 लाख 37 हजार 870 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.14 टक्के इतके आहे.
आज पर्यंत पाठवण्यात आलेल्या 32 लाख 64 हजार 384 नमुन्यांपैकी 18.85 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात 1 लाख 56 हजार 608 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 20 हजार 687 वर पोहोचला आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.36 टक्के इतके आहे.
सध्या राज्यात 11 लाख 35 हजार 749 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 38 हजार 175 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.