कारवाई करण्याची शेतकऱयांची मागणी : जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
उक्कडजवळील नंदिगुडी ऑईल
ऍग्रो इंडस्ट्रीजच्या मालकाने आपली फसवणूक केली असून संबंधित मालकावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मरकट्टी येथील शेतकरी गंगाप्पा फकिराप्पा आरेर यांनी नंदिगुडी कारखान्याला 16 क्विंटल सोयाबिन पाठविले. मात्र त्यामध्ये माती आहे म्हणून जवळपास 2 क्विंटल 60 किलो वजनामध्ये कमी करण्यात आले. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला असून योग्य न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
नंदिगुडी ऑईल ऍग्रोमध्ये सोयाबिन देण्यासाठी गेले असताना 4 हजार 320 रुपये क्विंटल दर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्या ठिकाणी सोयाबिन घेऊन गेलो. तेथे वजन केल्यानंतर माती जास्त आहे. त्यामुळे 2 क्विंटल 60 किलोची किंमत देणार नाही, असे सांगितले. याचबरोबर दर देतानाही 4 हजार 200 रुपयांप्रमाणे दर देण्यात आला आहे. एकूणच शेतकऱयांची या कारखान्यांमधून फसवणूक होत आहे. तेंव्हा त्या कारखान्यावर कारवाई करावी.
गोर-गरीब शेतकरी सोयाबिन घेऊन विक्रीसाठी जातात. प्रथम दर एक सांगत आहेत, त्यानंतर दरामध्ये कमी करण्यात येत आहे. पक्क्मया बिलपावत्या देखील देण्यात येत नाहीत. त्यामुळे शेतकऱयांची फसवणूक होत आहे. हमाली म्हणून गंगाप्पाकडून 300 रुपये घेतल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एकूणच शेतकऱयांची लूट होत असून जिल्हाधिकाऱयांनी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी गंगाप्पा आरेरसह शेतकरी उपस्थित होते.