जिह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे आर.टी.ई चे 113 कोटी रूपये फी परतावा थकीत
प्रतिनिधी/ सातारा
जोपर्यंत शासनाकडून थकीत फी परतावा रक्कम मिळत नाही तोपर्यंत आर.टी.ई अंतर्गत सर्व शाळा प्रवेशांवर बहिष्कार टाकणार असे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱयांना इनडिपेंडट इंग्लिश स्कूल असोसिएशन संघटनेच्या वतीने वाई, फलटण, कोरेगाव, पाटण, खंडाळा, महाबळेश्वर येथील शाळांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी विविध शाळांचे संस्थाचालक उपस्थित होते.
सातारा जिल्हय़ात इंग्रजी माध्यमांच्या एकूण 227 शाळा आहेत. यामध्ये आर.टी.ई अंतर्गत इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंत 42098 इतके विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांची मागील 4 ते 5 वर्शाची आर.टी.ई फी परतावा देय रक्कम शासनातर्फे 113,0,0,00,000/- (रू. एकशो तेरा कोटी) थकीत आहे.
केंद्र सरकारने 2009 साली आरटीई आणला. या कायद्यांतर्गत सर्व बालकांना शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे. यानंतर महाराष्ट्र सरकारने हा कायदा महाराष्ट्रात 2012-13 साली अमंलात आणला. परंतु या कायद्याच्या अंमलबजावणी संबंधी शासन उदासीन असल्याचे जाणवते. या कायद्याअंतर्गत शासनाने सर्व मुलामुलींना शिक्षण उपलब्ध करणे अनिवार्य आहे. ज्या शाळांमध्ये ही मुले शाकत आहेत त्या शाळांना शासनाने त्यांची फी भरणे कायदयात नमूद केले आहे. सरकारी शाळांमध्ये प्रवेशा मोकळे असताना सुध्दा ही जबाबदारी शासनाने खाजगी व विनाअनुदानित शाळांवर टाकली आहे. व आजअखेर या खाजगी शाळांना मागील 4 वर्षाची थकीत फी परतावा दिला नाही. या शाळा विना अनुदानित असल्यामुळे हा थकित फी परतावा बोजा सहन करू शाकत नाहीत तसेच व कोविड काळात काही शाळा बंद सुध्दा पडल्या आहेत.
सद्यस्थितीत सुरू असलेल्या शाळा आर्थिक संकटात असून, शाळांच्या शाक्षकांचे पगार वेळेवर देणेही जिकीरीचे होवून बसले आहे. यामुळे जिल्हयातील विना अनुदानित शाळा एकत्र येऊन शाक्षणाधिकारांच्या कार्यालयात निवेदन देऊन चर्चा केली यामध्ये अनेक मुख्य मागण्या मांडण्यात आल्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनी स्पष्ट सांगितले की, याचे अधिकार आमच्याकडे नाहीत, तुम्ही ज्यांनी ही स्कीम आणली आणि राबवली त्या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारकडे जावा आमचा काही संबंध नाही. आम्ही फक्त शासनाच्या आदेशाचे पालन करत आहोत. आजपर्यंत अनेकवेळा शिक्षण संस्थाचालक, संघटना यांनी प्रत्यक्ष शाक्षणाधिकारी यांना भेटून आरटीई अंतर्गत दरवर्षी पालक, शासन आणि स्कूल यांच्यात वादविवाद होऊ नयेत तसेच त्याचा विद्यार्थ्याच्यावर दुष्परिणाम होऊ नये म्हणून पत्राद्वारे आणि समक्ष भेटून सांगितले आहे परंतु शाक्षणाधिकारी यांनी पूर्णपणे दूर्लक्ष केलेले आहे.
यावेळी आयईएसए संघटनेचे राज्य उपाध्यक्ष व गुरुकुल शाळेचे राजेंद्र चोरगे, हिंदवी स्कूलचे अमित कुलकर्णी तसेच कर्णल नरहरी, युनिव्हर्सल शाळेचे नितीन माने, शानबाग शाळेच्या आचल शानबाग घोरपडे, चॅलेंज ऍकॅडमीचे कोरेगावचे दिलिप वेलवेट्टी, ज्ञानदिप स्कूल वाईचे संचालक दत्ता मर्ढेकर, दिशा अकॅडमी वाईचे नितीन कदम, पाटण व्हॅली स्कूल, पाटण, इंग्लिशा मिडीअम स्कूल उरूल, विश्वतेज इंग्लिश मिडीअम स्कूल वाई, साधना इंग्लिश मिडीअम स्कूल सातारा, विवेकानंद हयुमन एक्सलेंन्स चिमणगांव, प्रोग्रेसिव इंग्लिश मिडीअम स्कूल फलटण, ब्रिलियंट इंग्लिश मिडीअम स्कूल खंडाळा व इतर संस्थाचालक उपस्थित होते.