ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रिय वाणिज्य, उद्योग आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले की, नवोदित कल्पना भारताला जागतिक पुरवठा साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देण्यास सहाय्यभूत ठरतील. ‘सीआयआय’ च्या ‘लाँच ऑफ इंडियाज फ्युचर बिझनेस ग्रुप’ कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.
ते म्हणाले, नवोदित उद्योजक भारताचे भविष्य बदलणार आहेत. भारतात नवोदित उद्योजकांना व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला समविचार देशांसह आणि विश्वासू भागीदारांसह एक व्यासपीठ तयार करण्याची गरज आहे. नवोदित उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, भारत अन्य देशांना सहभागी करून घेऊ शकतो आणि विश्वासू भागीदारांसह एक व्यासपीठ तयार करू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
जागतिक संशोधन निर्देशांकात भारताची 52 व्या क्रमवारीवरून 48 व्या क्रमवारीवर झालेल्या प्रगतीबाबत बोलताना गोयल म्हणाले, खऱ्या अर्थाने भारताला संशोधनाचे केंद्र बनविण्यासाठी सगळे जण मिळून एकत्र काम करूया. भारतात व्यवसाय करणे सहज आणि सोपे होण्यासाठी उद्योगक्षेत्र प्रोत्साहन देईलच शिवाय सरकार देखील सक्रीयपणे नवीन कल्पना आणि प्रक्रियांचा अवलंब करून पुढे जाईल. या पृथ्वीतलावरची कोणतीही शक्ती आपल्याला यशस्वी होण्यापासून आता रोखू शकणार नाही.