ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशाचं हित जपणं हेच भाजपचे पहिले कर्तव्य आहे. दिल्लीतले नागरिक जे मतदान करतील त्यामुळेच दिल्लीचं भवितव्य बदलणार असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
दिल्लीमध्ये विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहील्या प्रचारसभेचे आयोजन आज करण्यात आले. त्या सभेमध्ये ते बोलत होते.
मोदी म्हणाले, भाजप नकारात्मकतेत नव्हे तर सकारात्मकतेवर विश्वास ठेवते. आपल्या देशासमोर जी आव्हाने आहेत, ती आम्ही सोडवतोय. दिल्लीच्या 40 लाखांहून अधिक लोकांना आमच्या सरकारने चिंतेतून मुक्त केलं आहे.
दरम्यान, 11 फेब्रुवारीनंतर दिल्लीत जेव्हा भाजपचं सरकार बनेल तेव्हा दिल्लीमधील विकासकामे आणखी वेगाने पुढे सरकणार आहेत. दिल्लीमधील कॉलनींसाठी डेव्हलपमेंट फंड बनवला जाईल. झोपडीधरकांना पक्की घरं मिळतील, असं आश्वासन मोदी यांनी दिलं.