घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यात येत असल्याचा दावा फोल ठरला
प्रतिनिधी / बेळगाव
शहर आणि उपनगरांतील कचऱयाची उचल घरोघरी जाऊन करण्यात येत असल्याचा दावा महापालिका आणि कॅन्टोन्मेंटकडून करण्यात येतो. पण कोनवाळ गल्ली नाला स्वच्छतेवेळी 13 टिप्पर कचरा काढण्यात आला आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यात येत असल्याचा दावा फोल ठरला आहे. कचऱयाची उचल होत नसल्याने गटारी आणि नाल्यामध्ये कचरा टाकण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्वच्छ भारत योजनेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात. याअंतर्गत शहरातील कचराकुंडय़ा हटवून कचरामुक्त शहर करण्यात येत आहे. शहरात स्वच्छता करण्यात येत असल्यामुळे रस्ते कचरामुक्त होत आहेत. मात्र, नाले कचऱयाने भरले आहेत. विशेषतः कोनवाळ नाला कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतून वाहतो, तसेच महापालिका व्याप्तीमधून बळळारी नाल्याला पोहचतो. मात्र, कोनवाळ गल्ली परिसरात नाला कचऱयाने तुडुंब भरत असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील वषी नाल्याची स्वच्छता करण्यात आली नसल्याने पावसाचे पाणी नालाकाठावरील घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे हाल झाले.
यंदा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता नाल्याची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. कोनवाळ गल्ली नाला तुडुंब भरल्याने कचऱयाच्या विळख्यात नाला अडकला होता. त्यामुळे नाला स्वच्छता करण्याचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले. सलग तीन दिवस नाला स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले होते. यावेळी तेरा टिप्पर कचरा नाल्यामधून काढण्यात आला. काढण्यात आलेला कचरा ठेवण्यास नागरिकांना विरोध केल्याने सदर कचरा तुरमुरी कचरा डेपोमध्ये टाकण्यात आला.
नाल्यात कचरा टाकणाऱयांवर कोण कारवाई करणार?
नाल्यामधील कचऱयाचे प्रमाण पाहता घरोघरी जाऊन कचरा गोळा करूनही नाल्यामध्ये मोठय़ा प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. नाला आणि गटारीमध्ये कचरा टाकण्यात येऊ नये, असे आवाहन करूनही कचरा नाल्यामध्ये टाकण्यात येत असल्याने नाला तुंबण्याची समस्या निर्माण होत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत कचरा नाल्यात टाकण्यात येत असल्याचा दावा मनपातर्फे करण्यात येत आहे. पण कोण कारवाई करणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.