मुंबई \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभेत २०१६-१७ मध्ये आपण भाजप खासदार असताना आपला फोन टॅप केला असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. दरम्यान, या प्रकरणावरून भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. ना काँग्रेसला कोणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला, असा टोला त्यांनी नाना पटोले यांना लगावला आहे.
म्हणत भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत म्हणाले, नाना पटोले काय ही तुमची अवस्था. काँग्रेसमुळे जे सत्तेत आहेत, तेच प्रदेशाध्यक्षांविरोधात काम करत आहेत. थेट प्रदेशाध्यक्षांवर उद्धव ठआकरे, दिलीप वळसे-पाटील, अजित पवार यांची पाळत. फोन टॅप तरी काँग्रेस गप्प… ना सत्तेत काँग्रेसला कोणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला, असं चित्र आहे हे,” असं म्हणत उपाध्ये यांनी पटोलेंना टोला लगावला.
नाना पटोले काय म्हणाले होते ?
मी स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे आपण कामाला लागा. मी माध्यमांशी बोलताना म्हणालो की, मुख्यमंत्र्यांनी काल शिवसैनिकांना कामाला लागण्याबद्दल सांगितलं. मग मी बोललो होतो तर त्रास होत होता, ते बोलले तर ठीक आहे. आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची कामं करतात. आपल्या लोकांची कामं करतात का? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते त्यांनी ठरवायचं.कारण सही त्यांची लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही, असा टोला नाना पटोले यांनी अजित पवार यांना लगावला होता. काँग्रेस मोठी होती हे त्यांना खपत नाही. त्यासाठी पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना ताकदीनं उत्तर द्यायचं आहे. त्रासाला ताकद बनवा,आत्मविश्वासानं पुढे जा आणि संघटना बांधणीवर भर द्या. २०२४ मध्ये काँग्रेस राज्यात स्वबळावर येणार,” असं पटोले यावेळी म्हणाले.