नितेश राणे यांनी उच्च न्यायालयातील जमीन अर्ज मागे घेतला
ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मंगळवारी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र नितेश राणे यांनी हायकोर्टातील अर्ज मागे घेतला असल्याची माहिती त्यांचे वकील सतीन मानेशिंदे यांनी दिली आहे. तसेच ते कणकवली दिवाणी न्यायालयात हजर झाले आहेत.
दरम्यान, नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या संरक्षणामध्ये पाच दिवस शिल्लक असतानाही तपास अधिकाऱ्यासमोर शरण जात असल्याचं सांगत हायकोर्टातील जामीन अर्ज मागे घेतला आहे. त्यांना तपासाला सामोरं जाण्याची इच्छा आहे”. हायकोर्टानेदेखील अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली आहे.
दरम्यान, नितेश राणे यांचा उच्च न्यायालयातील जमीन अर्ज मागे घेतल्यानंतर नितेश राणे कणकवली दिवाणी न्यायालयात हजर झाले आहेत. ते चौकशीस पूर्णपणे सहकार्य करणार आहेत. तसेच न्यायालयावर आपला विश्वास असून न्यायालयाचा आदर करतो असं नितेश राणे यांनी म्हंटले आहे.
अमित शाह यांचं उदाहरण देत नितेश राणे यांचं सूचक ट्वीट, म्हणाले…
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. तसेच, ते आता न्यायालयासमोर शरण देखील होत आहेत. याबाबत त्यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली आहे. शिवाय, नितेश राणे यांनी एक सूचक ट्वीट देखील केलं आहे. यामध्ये त्यांनी समय बडा बलवान है.. असं म्हटलं आहे.