ऑनलाईन टीम/तरुण भारत
पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा शनिवारी जाहीर झाल्या आहेत. देशात राजकीय पक्षांची तयारी सुरु झाली आहे. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मनिपूरमध्ये विधानसभा निवडणुकींसाठी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशची निवडणुक सर्वात महत्त्वाची मानली जात आहे. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक जाहीर होताच अधिकारी व्हीआरएस (स्वैच्छिक सेवानिवृत्ती) घेत असल्याच्या बातम्या येत आहेत. कानपूरचे पोलीस आयुक्त असीम अरुण यांनी आठ जानेवारी रोजी व्हीआरएस अर्ज आणि भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत वक्तव्य केले आहे. तर आता अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) सहसंचालक राजेश्वर सिंग यांचा व्हीआरएस स्वीकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.