शनिवारी ढगाळ वातावरणामुळे मळणीकामात व्यत्यय
प्रतिनिधी/ बेळगाव
निसर्गाच्या लहरीपणाला बळीराजा अक्षरशः वैतागला आहे. मध्यंतरी झालेल्या दमदार पावसामुळे काही भागामध्ये पूर आला. त्यामुळे पिकांना फटका बसला होता. त्यामधून सावरून पिकांची सुगी करत असताना शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी झालेल्या पावसाच्या शिडकाव्यामुळे बळीराजा अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना निसर्गही अशा प्रकारे वेळोवेळी दणका देत असल्यामुळे आम्ही कसे सावरू, असा प्रश्न बळीराजा करत आहे.
भाताची सुगी करून मळण्यांना सुरुवात झाली आहे. तालुक्मयातील अनेक गावांमध्ये मळणीकामे जोमात सुरू आहेत. काही ठिकाणी कडधान्य पेरणीदेखील झाली आहे. नोव्हेंबर महिना संपत असताना बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन बेळगाव परिसरातही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. मात्र, यामुळे हातातोंडाला आलेल्या पिकांना फटका बसू लागला आहे.
शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण आणि हवेमध्ये गारवा निर्माण झाला होता. मध्यंतरी हिवाळय़ाची थंडी सुरू झाली असताना आता ढगाळ वातावरणाबरोबरच जोरदार वारे वाहताना दिसत आहेत. त्यामुळे मळणी काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. काही ठिकाणी भात कापणीही सुरू आहे. अंतिम टप्प्यात हे काम असताना आता पावसाळी वातावरण तयार झाल्याने शेतकऱयांच्या मनात धडकी निर्माण झाली आहे. आम्ही किती टक्कर द्यायची, असाच प्रश्न शेतकऱयांना पडला आहे.
ऑगस्टमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे जिह्यातील जवळपास 96 हजार 590 हेक्टरमधील पिकांना फटका बसला होता. याचबरोबर 5 हजार 311 हेक्टरमधील भाजीपाला खराब झाला होता. 3 हजार 627 घरे कोसळली होती. याचबरोबर रस्ते, शाळांच्या इमारती कोसळल्या होत्या. चिकोडी, गोकाक, रायबाग तालुक्मयातील अनेक गावांना पूराचा फटका बसला होता. मात्र, पावसाने उसंत घेतल्याने काही दिवसांत पूर ओसरला. परंतु अनेक भागातील पिके वाया गेली होती.
यावषी मान्सूनने चांगली साथ दिली. त्यामुळे कृषी विभागाने निश्चित केलेल्या उद्दिष्टामध्ये पेरणी पूर्ण झाली होती. पिकेही जोमात असताना वारंवार निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱयांना बसू लागला आहे. मागील वषी तर मोठा फटका बसला होता. त्यामधून सावरत असताना कोरोनाने घेरले. कोरोना सुरू असतानाच ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान पूर आला. त्यामुळे शेतकऱयांना जीवन जगणे अवघड झाले.
कोरोनामुळे बेरोजगारी वाढली आहे. शहरामध्ये राहणारे नागरिक गावांकडे वळले. त्यांनी शेतीमध्ये पिके घेण्यासाठी प्रयत्न केले असताना आता पुन्हा शनिवारपासून ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी होणाऱया पावसामुळे फटका बसू लागला आहे.
ऊस तोडणीत व्यत्यय
जिल्हय़ातील गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. ऊस तोडणी जोमात आहे. ऊस तोडणीसाठी शेतकऱयांनी हालचाली सुरू केल्या आहेत. असे असताना ढगाळ वातावरणामुळे ऊस तोडणीच्या कामामध्येही व्यत्यय निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकऱयांना या पावसाचा फटका बसण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.
मळणी करणाऱया शेतकऱयांची धांदल
ऐन सुगीच्या हंगामात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या शिडकाव्याने कडोली परिसरातील शेतकऱयांची तारांबळ उडाली आहे. सध्या कडोली परिसरात भात सुगी आणि मळणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, यातच शनिवारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
पावसाचा शिडकावा होत असल्यामुळे अनेक शेतकऱयांनी खळय़ात टाकलेल्या भातांवर आणि गंजींवर ताडपत्री घातली आहे. शनिवारी पहाटेपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱयांची धावपळ वाढली आहे.
येळ्ळूर परिसरात मळणी कामात व्यत्यय
येळ्ळूर परिसरात भात कापणी जवळपास पूर्ण झाली असून मळणीच्या कामांना जोरदार सुरुवात झाली आहे. शनिवार आणि रविवार सुटी असल्यामुळे अनेक शेतकऱयांनी शनिवारी मळणी करण्यासाठी जोडणी केली होती. मात्र, ढगाळ वातावरण आणि पावसाचा शिडकावा यामुळे मळणी काम थांबवावे लागले. काही शेतकऱयांनी पहाटेच मळणी करण्यासाठी भात खळय़ामध्ये टाकले होते. त्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
येळ्ळूर गावामध्ये भात पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. जवळपास 100 टक्के शेतकरी भात पीकच घेत असतात. इतर पिके या परिसरात घेत नाहीत. त्यामुळे शेतकऱयांनी मोठय़ा आनंदाने सुगीची कामे आटोपती घेतली होती. मात्र, आता मळणी करताना या लहरी पावसाचा फटका बसू लागला आहे. यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत.