प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनमुळे परराज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी रेल्वे विभागाने श्रमिक रेल्वे सुरू केल्या. नैर्त्रुत्य रेल्वेने यामध्ये आघाडी घेत कर्नाटकात अडकलेल्या 3 लाख 2 हजार मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहचविले आहे.
राज्य सरकारच्या मागणीनुसार नैर्त्रुत्य रेल्वेने या श्रमिक स्पेशल रेल्वे सोडल्या आहेत. आतापर्यंत बिहारला 69 हजार, उत्तर प्रदेशला 49 हजार, झारखंड 21 हजार, पश्चिम बंगाल 21 हजार, ओडिसा 14 हजार, राजस्थान 79 हजार, आसाम 69 हजार, मध्यप्रदेश 57 हजार यासह इतर राज्यांना मजूर पाठविण्यात आले आहेत. यात हुबळी विभागातून 30 हजार 580 मजुरांना गावी सोडण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळात इतर वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने रेल्वेने मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पाठविण्यात आले. त्यामुळे मजुरांकडून रेल्वेचे आभार मानण्यात येत आहेत. मजुरांची आरोग्य तपासणी करूनच त्यांना रेल्वेमध्ये प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे या मजुरांसाठी ही रेल्वे जीवनदायिनी ठरली आहे.