पुणे | ऑनलाईन टीम
राज्य सरकारमध्ये अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे का? असे म्हणत महाविकास आघाडीला चंद्रकांत पाटील यांनी डिवचले होते. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात एक दिवसाचे अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे का? असे टीका त्यांनी भाजवर केली आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील पुण्यातील पुर्वनियोजित बैठकीसाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विरोधी पक्षातील नेते महाविकास आघाडीवर नेहमी टीका करत असतात यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशनासंबंधित केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी म्हटलंय की, पंतप्रधान मोदी यांच्यात अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे की नाही. या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते. कोरोना असल्याने लोकप्रतिनिधी येऊ शकत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील अधिवेशन मर्यादित केले होते. सर्वच राज्यात सारखीच परिस्थिती असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
उजनी धरणाच्या पाणी प्रश्नावर पाटील म्हणाले, सोलापुरकरांच्या उजनी धरणाच्या पाण्यावर जेवढा हक्क आहे. तो कोणीही हिरावून घेणार नाही. सोलापूर जिल्ह्याचा वाटेचं पाणी कुठेही जाऊ देणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्य सरकारमध्ये राज्याचं अधिवेशन घेण्याची हिम्मत नाही. अधिवेशन बोलवायला किती वेळ लागतो फक्त राज्यपालांना पत्र लिहावे लागते असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते.