प्रतिनिधी / बेळगाव
ज्येष्ठ लेखिका व पत्रकार पुष्पा त्रिलोकेकर-वर्मा (वय 85) यांचे दि. 9 रोजी पहाटे कांदिवली, मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या मागे पती प्रदीप वर्मा व अन्य आप्तेष्ट आहेत.
पुष्पा त्रिलोकेकर यांनी दै. मराठामधून पत्रकारितेला सुरुवात केली. आणी-बाणीत हे दैनिक बंद झाल्याने त्यांनी ‘पहारा’ हे सायंदैनिक सुरु केले. आचार्य अत्रे यांच्या पत्रकारितेचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी काही काळ ब्लिट्झमध्ये नोकरी केली. त्यानंतर मुक्त पत्रकार म्हणून काम केले. अनेक साप्ताहिकांमध्ये त्यांनी काम करून सांस्कृतिक विषयांवर लेखन ही केले. ‘द्रौपदीची थाळी’ हे त्यांचे पाककृती पुस्तक विशेष गाजले.