खासदार विनायक राऊत यांची माहिती : पाटबंधारे विभाग अधिकाऱयांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना
प्रतिनिधी / रत्नागिरी
लांजा तालुक्यातील पन्हळी धरणाला लागलेल्या गळतीवर तोडगा काढण्यासाठी या धरणाची तातडीने डागडुजी करण्याकडे पावले उचलण्यात आली आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात धरणातील पाणी प्रथम कमी करावे. त्यानंतर या धरणाची गळती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी 1 कोटीचा निधी मंजूर केल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे.
पन्हळे धरण गळतीच्या पार्श्वभुमीवर खासदार राऊत यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱयांसमवेत बुधवारी तातडीने पाहणी केली. या धरणास गळती लागल्याने तातडीने डागडुगी करण्यासाठी सौ.वैशाली नारकर, अधिक्षक अभियंता पाठबंधारे मंडळ रत्नागिरी यांना तात्काळ पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत. व इतर कालव्या संदर्भात कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले. त्यावेळी रत्नागिरी जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर मोरे, रत्नागिरी जिल्हा समन्वयक शरद जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, महाराष्ट्र किक्रेट असोसिएशन सदस्य व उद्योजक किरण सामंत, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, शिवसेना लांजा तालुकाप्रमुख संदिप दळवी, राजापूर तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, कार्यकारी अभियंता पाटील व लांजा तहसिलदार ओमासे, लांजा उपतालुकाप्रमुख सुरेश करंबळे, राजापूर उपतालुकाप्रमुख रामचंद्र सरवणकर, रत्नागिरी जिल्हा युवाधिकारी विनय गांगण, माजी जि.प.अध्यक्षा सौ.स्वरुपा साळवी, जि.प.सदस्य चंद्रकांत मणचेकर, लांजा सभापती सौ.लिला घडशी, उपसभापती सौ.दिपाली दळवी, नगराध्यक्ष मनोहर बाईत हे उपस्थित होते.