खानापूर : परप्रांतीय व्यापाऱयांकरवी विविध वस्तू व मार्ट वस्तू खानापूरसह सर्वत्र विकल्या जात आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापाऱयांना मोठय़ाप्रमाणात फटका बसत आहे. याचा विरोध म्हणून शुक्रवार दि. 26 रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व व्यापारी आपापली दुकाने बंद ठेवून त्याचा निषेध करणार आहेत. दवाखाने व औषधांची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. यासंबंधी तहसीलदार व नगरपंचायत मुख्याधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार आहे. परप्रांतीय व्यापाऱयांकडून विकल्या जाणाऱया वस्तू विरोधातील विचारविनिमयासाठी बुधवारी सायंकाळी रवळनाथ मंदिरात खानापूर शहरातील सर्व व्यापाऱयांची बैठक बोलविली होती. यावेळी सदरचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला अनेक व्यापारी उपस्थित होते.
Previous Articleमच्छे-पिरनवाडीतील कचरा समस्या सुटणार कधी?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.